शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच ...

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच झाले; परंतु न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच आहे, असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले.

समाजवादी प्रबोधिनी आणि येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजन पेडणेकर होते. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण’ हा चर्चासत्राचा विषय होता.

पाटील म्हणाले, भांडवलदारांना अनिर्बंध स्वातंत्र्य आणि शेतकरी व बाजार समित्यांना संकटात ढकलण्याचे काम केंद्र सरकार नव्या कायद्यातून करत आहे. त्याचा हेतू एक, भाषा एक आणि अर्थमात्र भांडवलशाहीचाच आहे. त्यामागे शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे कारस्थानच आहे.

कुलकर्णी म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला, सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना वाढत्या भांडवलशाहीचा धोका आहे. त्यातून देशाची अखंडताही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भांडवलीकरणाला वेळीच पायबंद घालायला हवा.

यावेळी प्राचार्य सुरेश चव्हाण, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. काशीनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.

--------------------------------------------------

* आभासी जगाचे षड्‌यंत्र

अन्न आणि वस्त्र हाच जगातील सर्वांत मोठा व्यापार आहे. म्हणूनच तो भांडवलदारांना आपल्याकडे हवा आहे. त्यासाठी जीवनाश्यक वस्तूंचा कायदा रद्द करण्याचा घाट भांडलवदारांनी घातला आहे. त्यासाठी तथाकथित विद्वानांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या हिताचे भासवणारे आभासी जग निर्माण करण्याचे षड्‌यंत्र पद्धतशीरपणे सुरू आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

--------------------------------------------------

* ‘त्या’ अहवालाविषयी शंका!

आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती नेमली आहे; परंतु केंद्राच्या नव्या कायद्यांचे समर्थन करणाऱ्यांचाच समितीत समावेश आहे. त्यातून केंद्राला हवा तसा निर्णय होण्याचा धोका आहे. म्हणूनच समितीच्या अहवालाबाबतही शेतकऱ्यांना शंका आहे, असेही पाटील म्हणाले.

--------------------------------------------------

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथील चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश चव्हाण, प्रसाद कुलकर्णी, राजन पेडणेकर, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी आदींची उपस्थिती होती.

क्रमांक : १३०१२०२१-गड-०८