शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच ...

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच झाले; परंतु न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच आहे, असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले.

समाजवादी प्रबोधिनी आणि येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजन पेडणेकर होते. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण’ हा चर्चासत्राचा विषय होता.

पाटील म्हणाले, भांडवलदारांना अनिर्बंध स्वातंत्र्य आणि शेतकरी व बाजार समित्यांना संकटात ढकलण्याचे काम केंद्र सरकार नव्या कायद्यातून करत आहे. त्याचा हेतू एक, भाषा एक आणि अर्थमात्र भांडवलशाहीचाच आहे. त्यामागे शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे कारस्थानच आहे.

कुलकर्णी म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला, सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना वाढत्या भांडवलशाहीचा धोका आहे. त्यातून देशाची अखंडताही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भांडवलीकरणाला वेळीच पायबंद घालायला हवा.

यावेळी प्राचार्य सुरेश चव्हाण, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. काशीनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.

--------------------------------------------------

* आभासी जगाचे षड्‌यंत्र

अन्न आणि वस्त्र हाच जगातील सर्वांत मोठा व्यापार आहे. म्हणूनच तो भांडवलदारांना आपल्याकडे हवा आहे. त्यासाठी जीवनाश्यक वस्तूंचा कायदा रद्द करण्याचा घाट भांडलवदारांनी घातला आहे. त्यासाठी तथाकथित विद्वानांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या हिताचे भासवणारे आभासी जग निर्माण करण्याचे षड्‌यंत्र पद्धतशीरपणे सुरू आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

--------------------------------------------------

* ‘त्या’ अहवालाविषयी शंका!

आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती नेमली आहे; परंतु केंद्राच्या नव्या कायद्यांचे समर्थन करणाऱ्यांचाच समितीत समावेश आहे. त्यातून केंद्राला हवा तसा निर्णय होण्याचा धोका आहे. म्हणूनच समितीच्या अहवालाबाबतही शेतकऱ्यांना शंका आहे, असेही पाटील म्हणाले.

--------------------------------------------------

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथील चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश चव्हाण, प्रसाद कुलकर्णी, राजन पेडणेकर, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी आदींची उपस्थिती होती.

क्रमांक : १३०१२०२१-गड-०८