शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘जीकेजी’वरील वर्चस्ववाद उफाळला

By admin | Updated: September 8, 2015 00:30 IST

दोन गट भिडले : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे धुमश्चक्री टळली

कोल्हापूर : गोखले कॉलेज परिसरात (जिकेजी) शनिवारी दोन गटांत हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मात्र, जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे दोन गटातील धुमश्चक्री पोलिसांनी वेळेवर येत रोखलीच शिवाय या तरुणांना लाठीचा प्रसाद देत ‘सळो की पळो’ करून सोडले. कॉलेजवर आमच्याच गटाचे वर्चस्व म्हणून जवाहरनगरातील आरसी गॅँगचा गट आणि परिसरातील एका नामांकित तालमीचे नाव घेणारा एक गट अशा दोन गटांत गेल्या कांही दिवसापासून धुसफूस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका गटातील तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या गटाने त्यावेळी या घटनेची फिर्याद पोलिसांत दाखल केली नाही. मात्र, याचे पडसाद सोमवारी उमटले. सोमवारी कॉलेज परिसरात एका गटाने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घ्यायचा व पुन्हा प्रतिस्पर्धी गटातील तरुणांना मारहाण करायची, असा डाव दोन्ही गटांनी केला होता. मात्र, तत्पूर्वीच कॉलेज परिसरात जमलेली गर्दी पाहून आणि त्यातील तरुणांचा रूद्रावतार पाहून जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी मोठ्या आवाजात लावलेल्या डॉल्बीविषयीही माहीती दिली. तत्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणांना पांगविण्यासाठी किरकोळ बळाचा वापर केल्याने तरुण वाट दिसेल त्या दिशेला पळत सुटले व मोठा अनर्थ टळला. गेले काही दिवस या परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून दोन्ही गटांत वाद होत हाणामारी सुरू आहे. मात्र, पोलीस कोणतीच ठोस कारवाई करत नसल्याने दोन्ही गट अधिक आक्रमक होऊ लागले आहेत. पोलिसात फिर्याद न देता एकमेकाचे उट्टे काढण्याचे प्रकार होत असल्याने या परिसरात कायम तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी ही एकमेकाला टार्गेट करण्याचा या दोन्ही गटांचा डाव होता. या रोजच्याच हाणामाऱ्यांमुळे या परिसरातील शांतता भंग झाली असून पोलिसांनी या परिसरात कायम बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तक्रारी वाढल्या पण ठोस कारवाई नाहीगोखले कॉलेजच्या बाहेर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरीलच तरुणांची गर्दी सध्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात कधी गाड्यांची तोडफोड, तर कधी तरुणांना मारहाण केली जात आहे. त्यात दररोज अशा घटना घडत असतानाही पोलीस लक्ष देत नसल्याची तक्रार येथील अनेक नागरिकांनी केली आहे. दररोजच्या या मारामारी व दहशतीच्या वातावरणामुळे या कॉलेजच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांची भांडणे आहेत ते तरुण भागातील एका तालमीचे नाव वापरतात. त्यामुळे अनेकदा तालमीचे नावही बदनाम होत आहे. या मारामारीत कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. जी मंडळी दहीहंडी व अन्य कार्यक्रम या परिसरात भरविते. तेही आपली जबाबदारी झटकून बाजूला जातात. ज्या विद्यार्थ्यांचा या दोन गटांशी काहीही संबंध नाही, असे विद्यार्थी पोलिसांचा मार खातात.