शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

दत्तात्रय पाटील, म्हाकवे कोरोनापासून बचावासाठी जसे सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब, कष्टकरी कामगार वर्ग जनसामान्यांच्या जीवनात चैतन्य यावे ...

दत्तात्रय पाटील, म्हाकवे

कोरोनापासून बचावासाठी जसे सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब, कष्टकरी कामगार वर्ग जनसामान्यांच्या जीवनात चैतन्य यावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ हे हयातभर अगदी वंगणाप्रमाणे कार्यरत आहेत. म्हणूनच त्यांच्या पाठीवर गोरगरीब, कष्टकरी, जनसामान्यांचे कवच आहे. अशा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने केलेला लेखनप्रपंच...

पूर्वी बैलगाडीच्या चाकांच्या कण्यांना वंगण (तेल) घातले जात. यामुळे बैलगाडी सुसाट वेगाने धावत होती. अगदी त्याचप्रमाणे ना. मुश्रीफ यांचे कार्य जनसामान्यांना आधार देणारे ठरले आहे.

मुश्रीफ हे आयुष्यभर गोरगरीब, दीनदलित जनता हीच आपली ताकद तीच आपली कवचकुंडले मानून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारमंत्री असताना जे कामगार ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दुसऱ्याला निवारा मिळावा यासाठी धडपडतात. त्या बांधकाम कामगारांना मात्र, आजारी पडल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे या कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना शासनदरबारी नोंदीत केले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कवचकुंडले ठरणारी मेडिक्लेम योजना अंमलात आणली. तसेच, त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची योजना यासह तब्बल २४ योजना अंमलात आणल्या. तसेच, निराधार कुटुंबांना पेंन्शनचा आधार, रुग्णांसाठी योजना यासह त्यांची अनेक कामे ही कम्युनिस्टांना शोभणारी आहेत. म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील जनता अगदी सहृदयीपणे लाल सलाम करते, हा त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरवच आहे.

गतवेळी कामगारमंत्री पदाचा पदभार आल्यानंतर मुश्रीफ यांनी नोंदणीकृत कामगारांच्या सर्व कुटुंबीयांना कवचकुंडले ठरेल अशी मेडिक्लेम योजना अमलात आणली. तसेच, महिला कामगारांसाठी प्रस्तुतीच्या कालावधीत पगारी रजा, त्यांना अनुदान तसेच, नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना पहिलीपासून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, साहित्य खरेदीसाठी अनुदान यासह विविध २४ योजेनांची अंमलबजावणी करण्यात ते यशस्वी झाले.

यासाठी कामगारांनीही प्रचंड संघर्ष केला असला तरी त्या संघर्षाला दाद देत योग्य निर्णय घेणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यामध्ये ना. मुश्रीफ यांचा हातखंडा असल्याची जाणीव कामगारांना आहे.

तसेच, विधी व न्यायमंत्रीपदाची धुरा मिळताच मुश्रीफ यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. आणि पुणे, मुंबई येथे जे मोठमोठे दवाखाने आहेत. जे शासनाकडून मदत घेतात. त्या दवाखान्यांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा कायदा आहे. त्याचा आधार घेत मुश्रीफांनी कागलसह जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहचविले आहे. त्यामुळेच त्यांना राज्यभरात किंबहुना गोरगरिबांचा ‘महाडाॅक्टर’असा नामोल्लेख झाला.

त्याचबरोबर त्यांनी मंत्रीपदाच्या काळात निराधार विधवा, परित्यक्ता महिला तसेच वयोवृद्धांना संजय गांधी निराधार पेंन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांना राज्यभर गोरगरीब वयोवृद्धांचा ‘श्रावणबाळ’ म्हणून ओळखले गेले.

तर आता ग्रामविकासमंत्रीपद मिळाल्यानंतर कागल मतदारसंघासह जिल्ह्यात कोट्यवधींचा निधी खेचून आणून गावागावात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढत पूर्वपदावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्यावर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या अनुभवामुळे त्यांना कामगार मंत्रीपद मिळताच राज्यातील सर्वच क्षेत्रांतील कामगार वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या काही मागण्यांची पूर्ती होईल, असा आशावादही कामगार वर्गाला वाटत आहे. जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या मुश्रीफ यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...!