शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सुन्या..सुन्या.. या बाजारात! ग्राहकांची प्रतिक्षा

By admin | Updated: August 24, 2015 00:25 IST

मंदिचे सावट : दरही घसरले, पावसाची दडी, उसाची बिले अडकल्याचा परिणाम

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मारलेली दडी, साखर कारखान्यांनी उसाची बिले काढली नसल्याने फळ व कडधान्य मार्केटमध्ये कमालीची शांतता आहे. श्रावण महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी फळांना फारशी मागणी दिसत नाही. गतवर्षीच्या तुलनेत निम्याहून कमी उलाढाल होत असल्याने सर्वत्र मंदीचे सावट दिसत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये जेमतेम आवक असली तरी भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. श्रावण महिन्यात फळे, भाजीपाल्यांसह फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते पण यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वच मार्केटवर परिणाम झाला आहे. फळ मार्केटमध्ये आवकही मर्यादित आहे, त्याबरोबर मागणीही नसल्याने मंदी दिसत आहे. मोसंबीची औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर येथून होणारी आवक अद्याप झालेली नाही. परिणामी बंगलोर, चेन्नई येथून होणाऱ्या आवकच सध्या बाजारात दिसत आहे. सीताफळची आवक सुरू आहे. पण सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाऊस नसल्याने आवकेवर मर्यादा आल्या आहेत. घाऊक बाजारात सीताफळाचा दर प्रति ढीग ५० ते २५०० रुपयांपर्यंत आहे. कडधान्य मार्केटमध्ये मंदी जाणवत आहे. साखरेचा दर स्थिर झाला असून किरकोळ बाजारात २८ रुपये किलोचा दर आहे. सरकी तेल, शाबू, मूग, मूगडाळीच्या दर स्थिर राहिले आहेत. भाजीपाला मार्केट गेले आठवड्याच्य तुलनेत घसरले आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे. गत आठवड्यात कोंथबीरचा दर शेकडा १६०० रुपये होता, त्यात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आली आहे. गवार, हिरवा टोमॅटोच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. कणसांची आवक वाढली असून किरकोळ बाजारात दोन कणसांचा दर दहा रुपये आहे. पडवळ, मुळाची आवक वाढली आहे.