शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सुन्या..सुन्या.. या बाजारात! ग्राहकांची प्रतिक्षा

By admin | Updated: August 24, 2015 00:25 IST

मंदिचे सावट : दरही घसरले, पावसाची दडी, उसाची बिले अडकल्याचा परिणाम

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मारलेली दडी, साखर कारखान्यांनी उसाची बिले काढली नसल्याने फळ व कडधान्य मार्केटमध्ये कमालीची शांतता आहे. श्रावण महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी फळांना फारशी मागणी दिसत नाही. गतवर्षीच्या तुलनेत निम्याहून कमी उलाढाल होत असल्याने सर्वत्र मंदीचे सावट दिसत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये जेमतेम आवक असली तरी भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. श्रावण महिन्यात फळे, भाजीपाल्यांसह फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते पण यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वच मार्केटवर परिणाम झाला आहे. फळ मार्केटमध्ये आवकही मर्यादित आहे, त्याबरोबर मागणीही नसल्याने मंदी दिसत आहे. मोसंबीची औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर येथून होणारी आवक अद्याप झालेली नाही. परिणामी बंगलोर, चेन्नई येथून होणाऱ्या आवकच सध्या बाजारात दिसत आहे. सीताफळची आवक सुरू आहे. पण सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाऊस नसल्याने आवकेवर मर्यादा आल्या आहेत. घाऊक बाजारात सीताफळाचा दर प्रति ढीग ५० ते २५०० रुपयांपर्यंत आहे. कडधान्य मार्केटमध्ये मंदी जाणवत आहे. साखरेचा दर स्थिर झाला असून किरकोळ बाजारात २८ रुपये किलोचा दर आहे. सरकी तेल, शाबू, मूग, मूगडाळीच्या दर स्थिर राहिले आहेत. भाजीपाला मार्केट गेले आठवड्याच्य तुलनेत घसरले आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे. गत आठवड्यात कोंथबीरचा दर शेकडा १६०० रुपये होता, त्यात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आली आहे. गवार, हिरवा टोमॅटोच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. कणसांची आवक वाढली असून किरकोळ बाजारात दोन कणसांचा दर दहा रुपये आहे. पडवळ, मुळाची आवक वाढली आहे.