शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विद्यापीठ कायद्याबाबत सुधारणा सुचवा

By admin | Updated: August 1, 2015 00:09 IST

बी. पी. साबळे : प्रस्तावित महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टबाबत कार्यशाळेत आवाहन

कोल्हापूर : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा मसुदा अधिकाधिक लवचिक व पारदर्र्शी होण्याच्या दृष्टीने त्रयस्थ भूमिकेतून सर्व संबंधित घटकांनी अभ्यास करून दुरुस्ती, सुधारणा सुचवाव्यात, असे आवाहन विद्यापीठ कायद्याचे अभ्यासक डॉ. बी. पी. साबळे यांनी शुक्रवारी येथे केले.प्रस्तावित महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिर्टी अ‍ॅक्टबाबत चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कोंगळे प्रमुख उपस्थित होते.डॉ. साबळे म्हणाले, उपलब्ध विविध कायद्यांचा अभ्यास करून नूतन कायदा तयार केला आहे. कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला, त्या दरम्यानच्या काळात केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान राबविण्यास सुरुवात झाली. त्याचा समावेश प्रस्तावित कायद्यात व्हावा. राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी एकच परीक्षा मंडळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सर्व घटकांनी त्रयस्थ भूमिकेतून प्रस्तावित कायद्याचा अभ्यास करावा व शैक्षणिक क्षेत्रासाठी भविष्यवेधी, लाभदायक कायदा निर्माण होण्यासाठी मौलिक सूचना कराव्यात. प्रा. जे. एफ. पाटील म्हणाले, प्रस्तावित कायद्यात निवडणुकांना फाटा देऊन नामनिर्देशनाचा मार्ग अवलंबला आहे. कायद्यात संचालकांची संख्या वाढविली असली तरी बीसीयूडी संचालकांचे पद मात्र यात उल्लेखित नाही. कुलगुरूंना सल्ला देण्यासाठी वैधानिक सल्लागार समिती नेमली आहे. त्यामुळे कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या की या समितीच्या सल्ल्याने काम करावे, असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिसभेमध्ये प्रत्येक संबंधित घटकाचे प्रतिनिधित्व दिसावे, अशी रचना करता येऊ शकेल का, याचाही विचार केला जाणे आवश्यक आहे.डॉ. मोरे म्हणाले, विधेयक तयार करताना शासनाने सांगोपांग विचार केला आहे. केवळ भारतातीलच नव्हे, पाश्चात्त्य देशांतील विद्यापीठे कायद्यांचाही अभ्यास बन्सल समितीसह सर्व समित्यांनी केल्याचे दिसून येते. त्यामुळे या कायद्यात सुधारणा सुचविताना अभ्यासपूर्ण पद्धतीनेच केल्या जाव्यात.कार्यशाळेत प्रा. सुधाकर मानकर, अमित कुलकर्र्णी, डॉ. वासंती रासम, प्रा. दीपक देशपांडे, विष्णू खाडे, वसंतराव मगदूम, श्वेता परुळेकर, डॉ. व्ही. बी. ककडे, विजय निकम, शंकरराव कुलकर्र्णी, एच. व्ही. देशपांडे, डॉ. नितीन सोनजे, शिवाजीराव परुळेकर, आनंद जरग, मिलिंद भोसले, शरद मिराशी, अजित इंगळे यांनी मते व्यक्त केली. यावेळी उपकुलसचिव संजय कुबल यांनी स्वागत केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)