शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दिवाळीसाठी पुरेशा पैशांची तजवीज : एटीएम कोरडे राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:38 IST

दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते.

ठळक मुद्देमुख्यालयाकडून बँकेचे शाखांना आदेश

रमेश पाटील।कोल्हापूर : दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून बँकेतून रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे या सणाच्या काळात बँकांमध्ये रोख रकमेची हमखास टंचाई भासते; परंतु आता बँकांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशा पैशांची तजवीज करून ठेवली आहे. तसे आदेशही बँकांच्या मुख्यालयाकडून बँकांना प्राप्त झाले आहेत. पैशांअभावी एटीएम सेंटर कोरडी पडणार नाहीत, याची काळजी घेण्यासही बँकांना सांगितले आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही पैशांच्या टंचाईमुळे बँकेच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता नाही.

दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे दिवसेंदिवस या काळात बँकांच्या तिजोऱ्या हलक्या होण्यास सुरुवात होते. बँकांच्या तिजोºया जरी हलक्या होत गेल्या, तरी त्यांना ट्रेझरीमार्फत पैशांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे बँकांना कधी पैशांचा तुटवडा जाणवत नसतो.

मात्र, गेल्या काही वर्षांत दिवाळी सणाच्या काळात लहान बँका, पतसंस्था, के्रडिट सोसायटी, तसेच साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जात असल्यामुळे या काळात अनेक सरकारी बँकांना कॅश टंचाईला सामोरे जावे लागत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, बँकांना स्वत:जवळ पुरेशा प्रमाणात रोख रक्कम ठेवण्याचे आदेश मुख्यालयाकडून प्राप्त झाले असून, बँकांनीही तशी तजवीज सध्या करून ठेवली आहे. तसेच ट्रेझरीतही पुरेशा प्रमाणात पैसे आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या काळात कॅश टंचाई जाणवणार नसल्याचे वास्तव आहे.

दरम्यान, बँकांचे अनेक ग्राहक एटीएममधून पैसे काढतात. दिवाळीसारख्या सणाच्या काळात तर एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे एटीएममध्ये सकाळी पैसे भरले, तर दुपारपर्यंत पैसे संपल्याचे चित्र असते. एकदा पैसे संपले की, दोन दिवस तरी त्या सेंटरमध्ये पैसे भरले जात नसल्याचे चित्र आहे. आता मात्र एटीएममध्ये पैसे संपले की, ते त्वरित भरले जावेत, अशा सूचना बँकांनी एटीएममध्ये पैसे भरणाºया एजन्सींना दिल्या आहेत.बँकेतून जादा रक्कम काढण्यावर नजरसध्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ज्या ग्राहकाने प्रमाणापेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यातून काढली असल्यास व अशा खातेदाराचा संशय आल्यास अशा काही संशयास्पद खातेदारांची माहिती निवडणूक यंत्रणेला कळविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत.कॅशलेश व्यवहारास प्राधान्यग्राहकांनी कॅशलेश व्यवहार करावेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून बँकांनी आणि सरकारने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम चांगल्याप्रकारे सध्या दिसून येत आहे. अनेकजण सध्या आॅनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग व्यवहार करीत आहेत.एटीएममधून दररोज सहा कोटीदिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चारशेंहून अधिक एटीएम सेंटरमधून दररोज सहा कोटींहून अधिक रक्कम काढली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :atmएटीएमDiwaliदिवाळीMONEYपैसा