शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
3
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
4
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
7
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
8
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
9
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
10
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
11
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
12
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
13
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
14
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
15
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
16
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
17
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
18
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
19
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
20
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?

‘स्वाभिमानी’ने रोखली ऊस वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:47 IST

मुरगूड : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याने ऊसतोड बंद ...

मुरगूड : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याने ऊसतोड बंद कराव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, ऊस मालकाने मी स्वत:च्या जबाबदारीवर ऊस कारखान्याला नेत असताना विनाकारण संघटना का अरेरावी करत आहे, असा प्रश्न उपस्थित केल्याने ऊस मालक, कारखाना कर्मचारी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. मुरगूड पोलिसांच्या बंदोबस्तात वाहने मार्गस्थ झाली.सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी मुरगूडमध्ये ठिय्या मांडला होता. दरम्यान, निढोरीकडून लिंगनूरमार्गे घोरपडे कारखान्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. कोणत्याही परिस्थितीत वाहतूक रोखायचीच या पवित्र्यात कार्यकर्ते होते. दरम्यान, मुरगूडमध्ये असणाºया विभागीय कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी आले. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरबरोबर ऊस मालक होता. तो ऊस कारखान्याला नेणार या मतावर ठाम होता.दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाम राहिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. याची कल्पना सहा. पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे पोलिसांसह घटनास्थळी आले. यावेळी अजित पोवार आणि तालुकाध्यक्ष बाळासो पाटील यांनी रविवारी कोल्हापुरातील बैठकीत दराबाबत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत घोरपडे कारखाना तोड बंद करेल, असे आश्वासन दिले होते, पण अद्यापही कारखाना सुरू असल्याचे समजल्याने आम्ही येथे आलो आहोत. यामध्ये पुढील निर्णय होईपर्यंत कारखान्याने तोडी न देण्याचा निर्णय जाहीर केला असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, कागल तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, जनार्दन पाटील, मालोजी जाधव, शिवाजी कळमकर, नामदेव भराडे, पांडुरंग चौगले, नामदेव शिपेकर, बाजीराव कांबळे, पी. टी. पाटील, पांडुरंग पाटील, साताप्पा पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जयसिंगपूर : उदगाव टोलनाका येथे सोमवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथणी शुगर्सकडे जाणारी ऊस वाहतुकीची दोन वाहने रोखली. ऊस दराबाबत कारखानदार व संघटनेमध्ये कोणताच तोडगा न निघाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना दराबाबत आक्रमक झाली असून प्रश्न मिटल्याशिवाय धुराडी पेटवू देणार नाही असा इशाराही दिला आहे. सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, आदी कार्यकर्त्यांनी उदगाव येथील टोल नाक्याजवळ ऊस वाहतुकीची वाहने अडविली.