शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

महापुरातील पाण्यामुळे उसाला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

* शिरोळ तालुक्यातील चित्र : शासनाकडून मदतीची प्रतीक्षा संदीप बावचे : जयसिंगपूर महापुरानंतर नदीकाठच्या ऊस शेतीचे विदारक चित्र पाहावयास ...

* शिरोळ तालुक्यातील चित्र : शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

संदीप बावचे : जयसिंगपूर

महापुरानंतर नदीकाठच्या ऊस शेतीचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. पिकातील दुर्गंधीबरोबरच जळण झालेल्या उसाचा काढणी खर्च परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तसाच ठेवला आहे. तर बुडीत उसाला कोंब फुटले आहेत. साखर कारखान्यांकडून वेळेत बुडीत ऊस तोड होणार का, असा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच नदीकाठची वीज जोडणी नसल्यामुळे महापुरातून बचावलेला ऊस पाण्याविना वाळू लागला आहे.

जुलैमध्ये आलेल्या कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा नदीच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फटका बसला आहे. महापुरानंतर नदीकाठचा ऊस भकास दिसू लागला आहे. १५ ते २० टक्के ऊस पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. वाचलेल्या उसाला शेंडे फुटून कोंब येऊ लागले आहेत. त्याचा परिणाम ऊस पोकळ होऊन वजनात घट होणार आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले पीक काढण्यासाठी एकरी दहा हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा पिकातून काही उत्पन्न निघणार नाही, त्यामुळे शेत रिकामे करणे हाच एक पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. त्यामुळे वाळलेला ऊस कोणी जळणासाठी व वैरणीसाठी दिला जात आहे. बुडीत उसाला कारखान्यांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

---------------

चौकट - वीज जोडणीची प्रतीक्षा

महापूर ओसरुन महिना उलटला तरी नदीकाठची वीज जोडणी नसल्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अडचणीचे बनले आहे. पावसामुळे दिलासा मिळाला होता; मात्र पुन्हा कडक ऊन पडू लागल्याने पिके वाळू लागली आहेत.

कोट - महापुरात ४८ गुंठे उसाचे नुकसान झाले. नऊ महिन्याचा ऊस अक्षरश: वाळून गेला. ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला होता. ऊस तुटून गेल्यानंतर दीड लाखाचे उत्पन्न मिळाले असते.

- आप्पासाहेब पाटील, शेतकरी राजापूर

-----------

कोट - महापुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न आहे. महागाई, शासनाचे बदलते धोरण यामुळे शेतीच करायची सोडून द्यावी, असा विचार येऊ लागला आहे. २०१९ प्रमाणे शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.

- सुरगोंडा कवंदे, शेतकरी दानोळी

फोटो - १६०९२०२१-जेएवाय-०१, ०२, ०३

फोटो ओळ - ०१) शिरोळ तालुक्यात महापुरात बुडीत झालेले ऊस पीक भकास दिसू लागले आहे.

०२ व ०३) बुडीत ऊस पिकाला कोंब फुटले आहेत. (सर्व छाया-भालचंद्र नांद्रेकर, दानोळी)