शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांची दिवाळी कडू

By admin | Updated: November 10, 2015 23:55 IST

कामगार हवालदिल : यावर्षी कारखानदारांकडून बोनसची वाच्यताच नाही

कोपार्डे : दिवाळी सण मोठा, आनंदा नाही तोटा, अशी म्हण साखर कामगारांच्या यंदाच्या दिवाळीला मात्र लागू पडत नाही. जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांनीही दिवाळीला कामगारांच्या बोनसबाबत वाच्यता केली नसून, आपल्या कुशल कामगिरीने शेतकऱ्यांसह जनतेची दिवाळी गोड करणाऱ्या साखर कामगारांची यंदाची दिवाळी मात्र कडू बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी १६ सहकारी, ७ खासगी आहेत. जवळजवळ ३० ते ३५ हजार साखर कामगार या उद्योगात हंगामी अथवा कायम स्वरूपात काम करतात. दरवर्षी कामगारांना त्यांच्या कामाची खुशाली म्हणून कारखानदारांकडून बोनस स्वरूपात दिवाळी भेट दिली जाते. यात ८.३३ टक्के बोनस व १५ ते १६ टक्के सानुग्रह अनुदान असा २२ ते २५ टक्के बोनस दिला जातो. मात्र, यावेळी काहीच न देण्याचा प्रकार प्रथमच झाला असून, साखर कामगारांत याबाबत मोठा असंतोष दिसून येत आहे. सध्या एफआरपीची ऊसदराची रक्कम एकरकमी मिळावी म्हणून शेतकरी संघटनांनी रेटा लावला आहे. मात्र, साखरेचे दर घसरल्याने एकरकमी ऊसदर देणे शक्य नसल्याची कारखानदारांनी भूमिका मांडली आहे. अशा परिस्थितीत जर साखर कामगारांना बोनस दिला, तर शेतकऱ्यांचा रोष निर्माण होईल, असा विश्वामित्री पवित्रा कारखानदारांनी घेतला. ना धड शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत भूमिका जाहीर केली, ना धड कामगारांना त्यांच्या हक्काच्या बोनसला न्याय दिला. यातून कष्टकऱ्यांमध्येच संशय निर्माण करण्याचे तंत्र कारखानदारांनी वापरले असल्याचे मत एका साखर कामगाराने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. वेतन कराराची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. याला १७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हंगामी कामगारांना केवळ चार महिन्यांच्या नोकरीवर संसार चालविणे कठीण झाले आहे, तर कायम कामगारांनाही चार-चार महिन्यांनी पगार मिळत आहे. याचा परिणाम साखर कामगारांची आर्थिक घडीच विस्कटत आहे. बहुतांश साखर कारखान्यांत संघटना कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. आक्रमक भूमिका न घेतल्याने साखर कामगारांच्या न्याय्य व हक्काच्या मागण्याही बाजूला पडत आहेत. साखर कामगारांच्या कष्टातून कारखान्यांना सुवर्णकाळ निर्माण झाला होता. मात्र, सहकारमहर्र्षींच्या तिसऱ्या पिढीने आपल्या कारभाराने हा उद्योग अडचणीत आणलाय. कामगारांचे हक्क दिलेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. - राजेंद्र नाळे (कॉमे्रड), साखर कामगार