शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

साखर कामगारांची दिवाळी कडू

By admin | Updated: November 10, 2015 23:55 IST

कामगार हवालदिल : यावर्षी कारखानदारांकडून बोनसची वाच्यताच नाही

कोपार्डे : दिवाळी सण मोठा, आनंदा नाही तोटा, अशी म्हण साखर कामगारांच्या यंदाच्या दिवाळीला मात्र लागू पडत नाही. जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांनीही दिवाळीला कामगारांच्या बोनसबाबत वाच्यता केली नसून, आपल्या कुशल कामगिरीने शेतकऱ्यांसह जनतेची दिवाळी गोड करणाऱ्या साखर कामगारांची यंदाची दिवाळी मात्र कडू बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी १६ सहकारी, ७ खासगी आहेत. जवळजवळ ३० ते ३५ हजार साखर कामगार या उद्योगात हंगामी अथवा कायम स्वरूपात काम करतात. दरवर्षी कामगारांना त्यांच्या कामाची खुशाली म्हणून कारखानदारांकडून बोनस स्वरूपात दिवाळी भेट दिली जाते. यात ८.३३ टक्के बोनस व १५ ते १६ टक्के सानुग्रह अनुदान असा २२ ते २५ टक्के बोनस दिला जातो. मात्र, यावेळी काहीच न देण्याचा प्रकार प्रथमच झाला असून, साखर कामगारांत याबाबत मोठा असंतोष दिसून येत आहे. सध्या एफआरपीची ऊसदराची रक्कम एकरकमी मिळावी म्हणून शेतकरी संघटनांनी रेटा लावला आहे. मात्र, साखरेचे दर घसरल्याने एकरकमी ऊसदर देणे शक्य नसल्याची कारखानदारांनी भूमिका मांडली आहे. अशा परिस्थितीत जर साखर कामगारांना बोनस दिला, तर शेतकऱ्यांचा रोष निर्माण होईल, असा विश्वामित्री पवित्रा कारखानदारांनी घेतला. ना धड शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत भूमिका जाहीर केली, ना धड कामगारांना त्यांच्या हक्काच्या बोनसला न्याय दिला. यातून कष्टकऱ्यांमध्येच संशय निर्माण करण्याचे तंत्र कारखानदारांनी वापरले असल्याचे मत एका साखर कामगाराने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. वेतन कराराची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. याला १७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हंगामी कामगारांना केवळ चार महिन्यांच्या नोकरीवर संसार चालविणे कठीण झाले आहे, तर कायम कामगारांनाही चार-चार महिन्यांनी पगार मिळत आहे. याचा परिणाम साखर कामगारांची आर्थिक घडीच विस्कटत आहे. बहुतांश साखर कारखान्यांत संघटना कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. आक्रमक भूमिका न घेतल्याने साखर कामगारांच्या न्याय्य व हक्काच्या मागण्याही बाजूला पडत आहेत. साखर कामगारांच्या कष्टातून कारखान्यांना सुवर्णकाळ निर्माण झाला होता. मात्र, सहकारमहर्र्षींच्या तिसऱ्या पिढीने आपल्या कारभाराने हा उद्योग अडचणीत आणलाय. कामगारांचे हक्क दिलेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. - राजेंद्र नाळे (कॉमे्रड), साखर कामगार