शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

साखर कामगारांची दिवाळी कडू

By admin | Updated: November 10, 2015 23:55 IST

कामगार हवालदिल : यावर्षी कारखानदारांकडून बोनसची वाच्यताच नाही

कोपार्डे : दिवाळी सण मोठा, आनंदा नाही तोटा, अशी म्हण साखर कामगारांच्या यंदाच्या दिवाळीला मात्र लागू पडत नाही. जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांनीही दिवाळीला कामगारांच्या बोनसबाबत वाच्यता केली नसून, आपल्या कुशल कामगिरीने शेतकऱ्यांसह जनतेची दिवाळी गोड करणाऱ्या साखर कामगारांची यंदाची दिवाळी मात्र कडू बनली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी १६ सहकारी, ७ खासगी आहेत. जवळजवळ ३० ते ३५ हजार साखर कामगार या उद्योगात हंगामी अथवा कायम स्वरूपात काम करतात. दरवर्षी कामगारांना त्यांच्या कामाची खुशाली म्हणून कारखानदारांकडून बोनस स्वरूपात दिवाळी भेट दिली जाते. यात ८.३३ टक्के बोनस व १५ ते १६ टक्के सानुग्रह अनुदान असा २२ ते २५ टक्के बोनस दिला जातो. मात्र, यावेळी काहीच न देण्याचा प्रकार प्रथमच झाला असून, साखर कामगारांत याबाबत मोठा असंतोष दिसून येत आहे. सध्या एफआरपीची ऊसदराची रक्कम एकरकमी मिळावी म्हणून शेतकरी संघटनांनी रेटा लावला आहे. मात्र, साखरेचे दर घसरल्याने एकरकमी ऊसदर देणे शक्य नसल्याची कारखानदारांनी भूमिका मांडली आहे. अशा परिस्थितीत जर साखर कामगारांना बोनस दिला, तर शेतकऱ्यांचा रोष निर्माण होईल, असा विश्वामित्री पवित्रा कारखानदारांनी घेतला. ना धड शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत भूमिका जाहीर केली, ना धड कामगारांना त्यांच्या हक्काच्या बोनसला न्याय दिला. यातून कष्टकऱ्यांमध्येच संशय निर्माण करण्याचे तंत्र कारखानदारांनी वापरले असल्याचे मत एका साखर कामगाराने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. वेतन कराराची मुदत एप्रिल २०१४ मध्ये संपली आहे. याला १७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हंगामी कामगारांना केवळ चार महिन्यांच्या नोकरीवर संसार चालविणे कठीण झाले आहे, तर कायम कामगारांनाही चार-चार महिन्यांनी पगार मिळत आहे. याचा परिणाम साखर कामगारांची आर्थिक घडीच विस्कटत आहे. बहुतांश साखर कारखान्यांत संघटना कारखानदारांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. आक्रमक भूमिका न घेतल्याने साखर कामगारांच्या न्याय्य व हक्काच्या मागण्याही बाजूला पडत आहेत. साखर कामगारांच्या कष्टातून कारखान्यांना सुवर्णकाळ निर्माण झाला होता. मात्र, सहकारमहर्र्षींच्या तिसऱ्या पिढीने आपल्या कारभाराने हा उद्योग अडचणीत आणलाय. कामगारांचे हक्क दिलेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. - राजेंद्र नाळे (कॉमे्रड), साखर कामगार