शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साखर विक्री कोटा बाजारातील मागणीपेक्षा जादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:41 IST

मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने खुल्या विक्रीसाठी २४ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा निश्चित केल्याने साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने खुल्या विक्रीसाठी २४ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा निश्चित केल्याने साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बाजाराची मागणी २० ते २१ लाख टनांची असताना ही साखर विकायची कशी, या विवंचनेत हे साखर कारखाने आहेत. याबाबत काही कारखान्यांनी आॅल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनकडे (इस्मा) गाºहाणे मांडल्यानंतर हा कोटा कमी करावा, अशी मागणी ‘इस्मा’ने केंद्र सरकारकडे केली आहे. राष्टÑीय साखर कारखाना महासंघही तशी मागणी करण्याच्या विचारात आहे.फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर दोनशे रुपयांनी वाढवून २९०० रुपयांवरून प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला आहे. मात्र, ही संभाव्य दरवाढ लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे दरवाढीनंतर साखरेला उठाव तुलनेने कमी आहे. शिवाय महिन्याला देशांतर्गत साखरेची गरज २० ते २१ लाख टन आहे. असे असताना साडेतीन लाख टन साखर तीसुद्धा वाढलेल्या दराने घ्यावयाची मानसिकता घाऊक व्यापाऱ्यांची नाही, हेही उठाव नसण्यामागचे एक कारण आहे. साखर कारखान्यांकडील रोखता वाढावी यासाठी जादा साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे समर्थन केंद्र सरकार करीत असले तरी यामुळे साखर कारखान्यांचीच अडचण झाली आहे. शिवाय निर्धारित कोटा त्याच महिन्यात व्रिकी करण्याचे बंधन असल्याने ही साखर विकायची कोठे? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे. यामुळेच हा कोटा कमी करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जात आहे.>महाराष्टÑाच्या वाट्याला ८.७९ लाख टनमार्च महिन्यासाठीच्या २४ लाख ५० हजार टन कोट्यापैकी महाराष्टÑाच्या वाट्याला आठ लाख ७९ हजार टन साखर आली आहे. यातील सुमारे सव्वादोन लाख टन साखर राज्यातच खपते. कारखान्यांना उर्वरित साखर बाहेरील राज्यांमध्ये विकावी लागते. याउलट उत्तर प्रदेशात उत्पादित झालेली ५० टक्क्यांहून अधिक साखर त्याच राज्यात खपते. उर्वरित साखरेच्या दराशी महाराष्टÑातील साखरेला स्पर्धा करावी लागते. यातही महाराष्टÑातील साखर कारखान्यांची अडचण होत आहे.>विक्रीसाठी निश्चित केलेला साखरेचा २४.५ लाख टनांचा कोटा कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्याबाबत महासंघाच्या १३ ते १५ मार्चदरम्यान होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.- जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष,राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ