शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साखर विक्री कोटा बाजारातील मागणीपेक्षा जादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:41 IST

मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने खुल्या विक्रीसाठी २४ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा निश्चित केल्याने साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : मार्च महिन्यासाठी केंद्र सरकारने खुल्या विक्रीसाठी २४ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा निश्चित केल्याने साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बाजाराची मागणी २० ते २१ लाख टनांची असताना ही साखर विकायची कशी, या विवंचनेत हे साखर कारखाने आहेत. याबाबत काही कारखान्यांनी आॅल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनकडे (इस्मा) गाºहाणे मांडल्यानंतर हा कोटा कमी करावा, अशी मागणी ‘इस्मा’ने केंद्र सरकारकडे केली आहे. राष्टÑीय साखर कारखाना महासंघही तशी मागणी करण्याच्या विचारात आहे.फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर दोनशे रुपयांनी वाढवून २९०० रुपयांवरून प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला आहे. मात्र, ही संभाव्य दरवाढ लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे दरवाढीनंतर साखरेला उठाव तुलनेने कमी आहे. शिवाय महिन्याला देशांतर्गत साखरेची गरज २० ते २१ लाख टन आहे. असे असताना साडेतीन लाख टन साखर तीसुद्धा वाढलेल्या दराने घ्यावयाची मानसिकता घाऊक व्यापाऱ्यांची नाही, हेही उठाव नसण्यामागचे एक कारण आहे. साखर कारखान्यांकडील रोखता वाढावी यासाठी जादा साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे समर्थन केंद्र सरकार करीत असले तरी यामुळे साखर कारखान्यांचीच अडचण झाली आहे. शिवाय निर्धारित कोटा त्याच महिन्यात व्रिकी करण्याचे बंधन असल्याने ही साखर विकायची कोठे? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे. यामुळेच हा कोटा कमी करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जात आहे.>महाराष्टÑाच्या वाट्याला ८.७९ लाख टनमार्च महिन्यासाठीच्या २४ लाख ५० हजार टन कोट्यापैकी महाराष्टÑाच्या वाट्याला आठ लाख ७९ हजार टन साखर आली आहे. यातील सुमारे सव्वादोन लाख टन साखर राज्यातच खपते. कारखान्यांना उर्वरित साखर बाहेरील राज्यांमध्ये विकावी लागते. याउलट उत्तर प्रदेशात उत्पादित झालेली ५० टक्क्यांहून अधिक साखर त्याच राज्यात खपते. उर्वरित साखरेच्या दराशी महाराष्टÑातील साखरेला स्पर्धा करावी लागते. यातही महाराष्टÑातील साखर कारखान्यांची अडचण होत आहे.>विक्रीसाठी निश्चित केलेला साखरेचा २४.५ लाख टनांचा कोटा कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्याबाबत महासंघाच्या १३ ते १५ मार्चदरम्यान होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.- जयप्रकाश दांडेगावकर अध्यक्ष,राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ