शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित उसाला पहिली उचल २५०० रुपये साखरेचे दर घसरले : कोल्हापुरातील कारखानदारांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी उर्वरित उसाला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत बुधवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात घाऊक बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर होता. त्यानुसारच बॅँकांची उचल गृहित धरून एफआरपी अधिक शंभर रुपये पहिली उचल व त्यानंतर दोन महिन्यांत शंभर रुपये देण्याचा निर्णय झाला; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली.

तीन महिन्यांत साखरेचे दर ३६०० वरून २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, बॅँकांचे मूल्यांकनही आपोआपच कमी झाले.बाजारभावाच्या ८५ टक्के उचल बॅँका देतात. त्यातून कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च व ‘एफआरपी’साठी घेतलेले मागील हंगामातील कर्जाचे हप्ते या सगळ्या कपाती वजा जाता ऊसदरासाठी केवळ १७७५ रुपये शिल्लक राहतात. यासह मोलॅसिस, बगॅस, प्रेसमडचे उत्पन्न मिळून २७६४ रुपयांपर्यंत रक्कम राहते. त्यातून सरासरी सहाशे रुपयांप्रमाणे तोडणी व ओढणी खर्च वजा जाता उसासाठी केवळ २१६४ रुपये उपलब्ध होतात. जाहीर दर व उपलब्ध होणारी रक्कम यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यात बॅँका जादा उचल देण्यास तयार नसल्याने कारखानदार कोंडीत सापडले आहेत.

जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत पैसे दिले जातील; पण सध्या शेतकºयांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.बैठकीला संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ, ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘आजरा’चे अध्यक्ष अशोक चराटी, ‘भोगावती’चे अध्यक्ष पी. एन. पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘राजाराम’चे पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.अशी आहे जिल्ह्यांतील उचलसोलापूर २१००पुणे २२००नागपूर २१००कोल्हापूर सरासरी २८०० (आतापर्यंत)