शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उर्वरित उसाला पहिली उचल २५०० रुपये साखरेचे दर घसरले : कोल्हापुरातील कारखानदारांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी उर्वरित उसाला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत बुधवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात घाऊक बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर होता. त्यानुसारच बॅँकांची उचल गृहित धरून एफआरपी अधिक शंभर रुपये पहिली उचल व त्यानंतर दोन महिन्यांत शंभर रुपये देण्याचा निर्णय झाला; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली.

तीन महिन्यांत साखरेचे दर ३६०० वरून २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, बॅँकांचे मूल्यांकनही आपोआपच कमी झाले.बाजारभावाच्या ८५ टक्के उचल बॅँका देतात. त्यातून कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च व ‘एफआरपी’साठी घेतलेले मागील हंगामातील कर्जाचे हप्ते या सगळ्या कपाती वजा जाता ऊसदरासाठी केवळ १७७५ रुपये शिल्लक राहतात. यासह मोलॅसिस, बगॅस, प्रेसमडचे उत्पन्न मिळून २७६४ रुपयांपर्यंत रक्कम राहते. त्यातून सरासरी सहाशे रुपयांप्रमाणे तोडणी व ओढणी खर्च वजा जाता उसासाठी केवळ २१६४ रुपये उपलब्ध होतात. जाहीर दर व उपलब्ध होणारी रक्कम यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यात बॅँका जादा उचल देण्यास तयार नसल्याने कारखानदार कोंडीत सापडले आहेत.

जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत पैसे दिले जातील; पण सध्या शेतकºयांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.बैठकीला संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ, ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘आजरा’चे अध्यक्ष अशोक चराटी, ‘भोगावती’चे अध्यक्ष पी. एन. पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘राजाराम’चे पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.अशी आहे जिल्ह्यांतील उचलसोलापूर २१००पुणे २२००नागपूर २१००कोल्हापूर सरासरी २८०० (आतापर्यंत)