शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

साखर दरात आणखी ५० रुपयांची वाढ

By admin | Updated: June 25, 2014 01:14 IST

केंद्राच्या निर्णयाचा परिणाम : शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीस ‘फिलगुड’

कोल्हापूर : साखरेचे आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून चाळीस टक्के करण्याचा निर्णय केंद्र शासनाने काल, सोमवारी घेतला. त्यामुळे खुल्या बाजारातील साखरेचे दर क्विंटलमागे आज, मंगळवारी आणखी ५० रुपयांनी वाढून ते २९२५ रुपयांपर्यंत गेले. केंद्र शासनाने काल घेतलेल्या दोन-तीन महत्त्वाच्या निर्णयांचा परिणाम म्हणून खुल्या बाजारातील साखरेचे दर वाढले आहेत. हा दर क्विंटलला ३२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिली उचल देऊन थांबलेल्या कारखान्यांना दसरा-दिवाळीस शेतकऱ्यांना टनामागे आणखी काही रक्कम देणे शक्य होईल.देशात गेल्या हंगामातील ९० लाख टन साखर शिल्लक आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात २४२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्याशिवाय १८ लाख टन कच्ची साखर आयात झाली. देशाची वार्षिक गरज २३० लाख टन असल्याने त्या तुलनेत साखर जास्त शिल्लक असल्याने दर घसरले होते; परंतु कालच्या निर्णयाने देशाच्या बाजारपेठेत आता बाहेरून साखर येण्यास निर्बंध आले व त्याचवेळी देशातील कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान मिळणार असल्याने ती साखर बाहेर जाणार, हे ध्यानात आल्याने व्यापारी साखर खरेदीकडे वळल्याचे चित्र एका दिवसात तयार झाले. परिणामी आज दरवाढ झाल्याचे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात नुकत्याच संपलेल्या साखर हंगामाच्या सुरुवातीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तिन्ही संघटनांनी पहिल्या उचलीसाठी जोरदार आंदोलन केले होते. बाजारातील साखरेचे दर घसरलेले असल्याने राज्य बँकेने मूल्यांकनच कमी केले. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिली उचल देणे शक्य नव्हते. त्यामुळे बहुतेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी कायद्याने जेवढी किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देणे बंधनकारक आहे, तेवढीच रक्कम दिली आहे. ही रक्कम सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु ‘स्वाभिमानी’ने केलेली तडजोड ही २६५० रुपये आहे. त्यामुळे आता टनास किमान २०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी संघटना आक्रमक होऊ शकते. साखर उद्योगासंबंधीचे चांगले निर्णय होण्यात खासदार राजू शेट्टी यांचाही सहभाग राहिला असल्याने आता कारखानदारीचे प्रश्न सोडविले तर तुम्ही शेतकऱ्यांना चांगले दर द्या, असा त्यांचा रेटा आहे. कालच त्यांनी आता पैसे नाहीत असे कोण कारखानदार सांगू लागला, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)