शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

साखर दरात आणखी ५० रुपयांची वाढ

By admin | Updated: June 25, 2014 01:14 IST

केंद्राच्या निर्णयाचा परिणाम : शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीस ‘फिलगुड’

कोल्हापूर : साखरेचे आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून चाळीस टक्के करण्याचा निर्णय केंद्र शासनाने काल, सोमवारी घेतला. त्यामुळे खुल्या बाजारातील साखरेचे दर क्विंटलमागे आज, मंगळवारी आणखी ५० रुपयांनी वाढून ते २९२५ रुपयांपर्यंत गेले. केंद्र शासनाने काल घेतलेल्या दोन-तीन महत्त्वाच्या निर्णयांचा परिणाम म्हणून खुल्या बाजारातील साखरेचे दर वाढले आहेत. हा दर क्विंटलला ३२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिली उचल देऊन थांबलेल्या कारखान्यांना दसरा-दिवाळीस शेतकऱ्यांना टनामागे आणखी काही रक्कम देणे शक्य होईल.देशात गेल्या हंगामातील ९० लाख टन साखर शिल्लक आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात २४२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्याशिवाय १८ लाख टन कच्ची साखर आयात झाली. देशाची वार्षिक गरज २३० लाख टन असल्याने त्या तुलनेत साखर जास्त शिल्लक असल्याने दर घसरले होते; परंतु कालच्या निर्णयाने देशाच्या बाजारपेठेत आता बाहेरून साखर येण्यास निर्बंध आले व त्याचवेळी देशातील कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान मिळणार असल्याने ती साखर बाहेर जाणार, हे ध्यानात आल्याने व्यापारी साखर खरेदीकडे वळल्याचे चित्र एका दिवसात तयार झाले. परिणामी आज दरवाढ झाल्याचे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात नुकत्याच संपलेल्या साखर हंगामाच्या सुरुवातीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तिन्ही संघटनांनी पहिल्या उचलीसाठी जोरदार आंदोलन केले होते. बाजारातील साखरेचे दर घसरलेले असल्याने राज्य बँकेने मूल्यांकनच कमी केले. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिली उचल देणे शक्य नव्हते. त्यामुळे बहुतेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी कायद्याने जेवढी किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देणे बंधनकारक आहे, तेवढीच रक्कम दिली आहे. ही रक्कम सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु ‘स्वाभिमानी’ने केलेली तडजोड ही २६५० रुपये आहे. त्यामुळे आता टनास किमान २०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी संघटना आक्रमक होऊ शकते. साखर उद्योगासंबंधीचे चांगले निर्णय होण्यात खासदार राजू शेट्टी यांचाही सहभाग राहिला असल्याने आता कारखानदारीचे प्रश्न सोडविले तर तुम्ही शेतकऱ्यांना चांगले दर द्या, असा त्यांचा रेटा आहे. कालच त्यांनी आता पैसे नाहीत असे कोण कारखानदार सांगू लागला, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)