शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कारखान्यांना साखर निर्यातीची सक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:43 IST

घाऊक बाजारातील साखरेचे दर पुन्हा घसरुन ते प्रतिक्विंटल २,८०० ते २,८५० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे साखर उद्योग पुन्हा चिंतेत आहे.

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर पुन्हा घसरुन ते प्रतिक्विंटल २,८०० ते २,८५० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे साखर उद्योग पुन्हा चिंतेत आहे. केंद्र सरकारनेही त्याची दखल घेत २० टक्के निर्यात कर रद्द करून कारखान्यांना साखर निर्यातीची सक्ती करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत.देशांतर्गत मागणी २५० लाख टन असून यंदा देशातील साखरेचे उत्पादन २९५ लाख टनावर जाण्याचा अंदाज आहे. गतवर्षीपेक्षा ते ९२ लाख टन म्हणजेच ४५ टक्क्यांनी जास्त असेल. त्यामुळे साखरेचे दर सहा महिन्यांपासून घसरत आहेत. घसरण थांबविण्यासाठी सरकारने ८ फेबु्रवारीला कारखान्यांना साखर विक्रीचा कोटा ठरवून दिला. त्यामुळे साखरेचे दर वाढून ते ३२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. मात्र, काही दिवसांत त्यात पुन्हा घसरण झाली.आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दरही सध्या घसरलेलेच असल्याने अनुदान दिल्याशिवाय कारखाने साखर निर्यात करू शकणार नाहीत. त्यामुळे साखरेच्या देशांतर्गत विक्रीवर कर आकारुन मिळणारा पैसा कारखान्यांना अनुदान स्वरूपात देण्याचा विचार सरकारकडून होऊ शकतो. तीन वर्षांतील साखर उत्पादनाच्या आधारे प्रत्येक कारखान्याला निर्यात कोटा ठरवून दिला जाणार आहे.२०१५ मध्येही सरकारने साखर निर्यातीची सक्ती केली होती. त्यावेळी ३२ लाख टनाचा कोटा कारखान्यांना दिला होता. मात्र, प्रत्यक्षात १५ लाख टन साखर निर्यात झाली होती. २०१६ च्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनेही नंतर निर्यात थांबविली होती.>देशातील साखरेचे विक्रमी उत्पादन पाहता निर्यात केल्याशिवाय साखरेचे दर वाढणार नाहीत. मात्र, त्यासाठी कारखान्यांना अनुदान देणे आणि हे धोरण पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवणे आवश्यक आहे. सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा आहे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ