शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जाणिवा समृद्ध करणारे ‘प्रत्यय’

By admin | Updated: March 14, 2016 00:03 IST

नाट्यकलेतून प्रबोधन : तीन दशकांहून अधिक काळ प्रयोग; वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न -- लोकमतसंगे जाणून घेऊ

संतोष तोडकर- कोल्हापूर --नाटक ही एक गांभीर्याने सादर करण्याची कला असून, तिचे मनोरंजन मूल्यही तितकेच महत्त्वाचे आहे हे मानून ३५ वर्षांहून अधिक वर्षे नाट्यक्षेत्रात वेगळी वाट चोखाळणाऱ्या संस्थेमध्ये ‘प्रत्यय’ हौशी नाट्य कला केंद्र महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते. जगभर पुरोगामी व प्रस्थापित कलाविष्काराला छेद देण्याकरिता १९८० च्या दशकात सुरू झालेल्या विविध कलात्मक प्रभावातून ऊर्मी घेऊन दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत कल्लोळी, पवन खेबुडकर, किरण खेबुडकर, अनिल सडोलीकर, शेखर पडळकर, उदय नारकर, माया पंडित, शरद नावरे या तरुण मंडळींनी ‘प्रत्यय’ची स्थापना केली. गेल्या ३५ वर्षांत ‘प्रत्यय’ने पूर्ण लांबीची एकूण २९ नाटके रंगभूमीवर सादर केली. चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याच्या अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचे काम करणाऱ्या नाटककार चंद्रकांत देशपांडेंचं ‘एक गगनभेदी किंकाळी’ हे नाटक सन १९८० मध्ये ‘प्रत्यय’ने रंगमंचावर आणत आपल्या नाट्यप्रवासाला सुरुवात केली. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसन्न कुलकर्णी यांनी केले होते. सन १९८१ मध्ये मूळ जर्मन लेखक ब्रर्टोल्ड ब्रेस्टच्या ‘एक्सेप्शन अ‍ॅँड द रूल’ या नाटकाचा दिलीप कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद ‘नियम आणि अपवाद’ हे नाटक संस्थेने सादर केला.करारी, तत्त्वनिष्ठ मार्किस्ट नेत्याच्या पराभूत थोरवीची गाथा सांगणारे गो. पु. देशपांडे लिखित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक सन १९८२ मध्ये ‘प्रत्यय’च्या माध्यमातून रंगमंचावर आले. या नाटकातून डॉ. शरद भुताडिया यांनी ‘प्रत्यय’साठी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (सन १९८४), घोडा (सन १९८५), सवाई माधवराव यांचा मृत्यू (सन १९८६), राशोमन (सन १९८७), उत्तररामचरित (सन १९८८), दुशिंगराव आणि त्याचा माणूस (सन १९८९), वाटा-पाऊलवाटा (सन १९९०), राजा लियर, सत्यशोधक (सन १९९३), फुटबॉल (सन २००१), कर्फ्यू (सन २००३), ऊन-पाऊस (सन २००५), दिव्याखाली उजेड (सन २००६), आईन्स्टाईन (सन २००६), नाहीच तर कुठून देणार?(सन २०१२), शेवटचा दिस (सन २०१३) या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक पवन खेबुडकर. स्त्रीजीवनातील अंधाऱ्या विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या गो. पु. देशपांडेलिखित ‘अंधारयात्रा ’(सन १९९१) या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी ‘प्रत्यय’मध्ये दिग्दर्शनाला सुरुवात केली. या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत तृतीय क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी सन १९९४ मध्ये ‘राशोमन’, तर सन १९९५ला ‘दुशिंगराव आणि त्याचा माणूस’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत ‘उत्कृष्ट नाटका’चे दुसरे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी चॅलेंज (सन १९९६), ऐन वसंतात अर्ध्या रात्री (सन २०००), क्राईम अँड पनिशमेंट (सन २०१४), ‘कबीर’ या नाटकांचे दिग्दर्शन केले. संस्थेतील दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नागमंडल (सन १९९७) हे नाटक दिग्दर्शित केले. सन १९९८ अनिल सडोलीकर यांनी ‘उत्तररामचरित’ हे नाटक पुन्हा नव्याने रंगमंचावर आणले तसेच दिग्दर्शक किरण खेबुडकर यांनी शनिवार-रविवार (सन १९९९), तसेच कर्फ्यू (सन २००४) या नाटकांसाठी दिग्दर्शनाची धुरा पेलली. दिग्दर्शक सुकुमार पाटील यांनी सन २००२ ‘प्रत्यय’साठी ‘चरणदास चोर’ या नाटकाचे दिग्दर्शन केले.दिग्दर्शक शरद भुताडिया यांनी दिग्दर्शित व अभिनय केलेल्या ‘किंग लियर’ या नाटकाचे कोलकाता, दिल्ली, नागपूर, बंगाली एज्युकेशन सोसायटी नागपूर, विदर्भ मराठी साहित्य परिषद, संगीत नाटक अकादमीचे केरळमधील ‘शेक्सपिअर महोत्सव’ या ठिकाणी प्रयोग झाले आहेत. ‘प्रत्यय’तर्फे सन १९८८ रंगमंचावर आणल्या गेलेल्या ‘उत्तररामचरित’ या नाटकाची नवी दिल्ली येथे झालेल्या संगीत नाटक अकादमी महोत्सवासाठी तसेच सन २००९ ‘आईन्स्टाईन’ या नाटकाची निवड नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (दिल्ली) येथील महोत्सवासाठी निवड झाली होती. ‘प्रत्यय’च्यावतीने एकांकिकाही विविध स्पर्धांमध्ये सादर केल्या आहेत. संस्थेला राज्य नाट्य स्पर्धेत ‘उत्कृष्ट नाटक’, ‘पटकथा’, ‘प्रक ाश योजना’, ‘रंगमंच सजावट’, ‘अभिनय’ यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीला शरण न जाता जीवनभाव समृद्ध करणारी दर्जेदार अव्यावसायिक नाटके हे ‘प्रत्यय’चे वैशिष्ट्य आहे. माणूस व समाजाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेकरिता कसदार, आशयघन नाटकांचे सादरीकरण करणे, त्यावर प्रतिक्रिया, चर्चा घडवून आणणे असे उपक्रम ‘प्रत्यय’ने आजपर्यंत राबविले आहेत. - डॉ. शरद भुताडिया ,नाट्य दिग्दर्शक ‘किंग लियर’ नाटकाचा एप्रिलमध्ये विशेष प्रयोग शेक्सपिअरच्या ४०० व्या स्मृतिदिनानिमित्त २३ एप्रिलला कोल्हापुरात ‘किंग लियर’ या नाटकाचा विशेष प्रयोग आम्ही करणार आहोत. सामाजिक जाणिवेपोटी पाश्चात्त्य व भारतीय रंगभूमीवरील क्लासिक, राजकीय विषयांवरील नाटकांचे प्रयोग यापुढेही संस्थेच्या वतीने रंगमंचावर आणली जातील.