शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अशी झाली आरक्षण प्रक्रिया

By admin | Updated: October 6, 2016 01:08 IST

जिल्हा प्रशासनाने पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सकाळच्या टप्प्यात त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी पूर्ण करून घेतले

कोल्हापूर : ग्रामीण विकासाचे आणि राजकारणाचेही महत्त्वाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया तब्बल दोन तास सुरू राहिली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या पुढाकाराने अत्यंत नेमकेपणाने ही प्रक्रिया पूर्ण झाली. काही गटांबद्दल लोकांनी हरकती घेतल्या परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही दहा आॅक्टोबरनंतर रितसर हरकत घ्या, त्याची नोंद घेऊ, असे स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सकाळच्या टप्प्यात त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी पूर्ण करून घेतले व त्यानंतर दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ही प्रक्रिया सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. या प्रक्रियेत कागलच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, शाहूवाडीच्या प्रांताधिकारी सुचित्रा शिंदे, तहसीलदार जयश्री जाधव, तहसीलदार (करमणूक) गणेश शिंदे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, संजय वळवी यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)बारा मतदारसंघांची बदलली नावेमतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर १२ मतदारसंघांची नावे बदलली. पणुंद्रेचे करंजफेण, आकिवाटचे दत्तवाड, गोकुळ शिरगावचे उजळाईवाडी, कोपार्डेचे शिंगणापूर, कळंबे तर्फ ठाणेचे निगवे खालसा, कसबा तारळेचे कौलव, शेणगावचे आकुर्डे, नूलचे बड्याचीवाडी, कडगावचे गिजवणे असे नामकरण झाले. चंदगडमधील अडकूर मतदारसंघ रद्द झाला. तर हलकर्णी, कुदनूर आणि अडकूर यांची नावे रद्द होऊन तुडिये आणि माणगाव हे नवे मतदारसंघ तयार झाले.पाचगाव तणावमुक्तआमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गटाच्या राजकीय ईर्षेतूनपाचगावच्या राजकारणाला वेगळे वळण लागले होते. परंतु पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही आरक्षित झाल्यामुळे पाचगाव तणावमुक्त झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.नगरपालिकेनंतरजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गटातटांच्या जोडण्या कशा होणार, हे नगरपालिकेच्या निवडणुकीतच ठरणार आहे. तिथे जे गट एकत्र येतील तेच पुढे जिल्हा परिषदेलाही एकत्र असतील. उदाहरणच द्यायचे झाल्यास कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ व ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा गट नगरपालिकेत एकत्र राहिला तर तो जिल्हा परिषदेतही एकत्र राहील असे चित्र आहे.दोन गट झाले कमी..जिल्हा परिषदेचे ६९ मतदारसंघ होते; परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या नियमांनुसार चंदगड व शिरोळ तालुक्यांतील प्रत्येकी एक असे दोन मतदारसंघ कमी झाले. जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदनही प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत करून सांगितल्याबद्दल जिल्हाधिकारी सैनी व पुरवठा अधिकारी आगवणे यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.