शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

By admin | Updated: May 14, 2015 23:38 IST

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा

नरेंद्र रानडे - सांगली दिवसेंदिवस होत चाललेल्या गतिमान आयुष्यामुळे कित्येकांना स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. ‘मी आणि माझे’ हेच अनेकांचे भावविश्व बनल्याने विभक्त कुटुंबपध्दती अंगवळणी पडत चालली आहे. तरीही काहीजण एकत्र कुटुंब पध्दतीची संकल्पना प्रत्यक्षात जोपासत आहेत, तर दुसरीकडे विभक्त कुटुंबांमधील घटस्फोट, कौटुंबिक वादविवाद, नातेसंबंधात दुरावा यातही वाढ झाली आहे. वृध्द व्यक्ती अनेकांना ‘ओझे’ वाटत असल्याने कुपवाडच्या वृध्दाश्रमात प्रतीक्षा यादी लागली आहे. हे चित्र म्हणजे कौटुंबिक नातेसंबंधातील रेशीमबंध सैल होत चालल्याचे निदर्शक आहे. पूर्वीची वाडा संस्कृती अपार्टमेंटच्या जगात कालबाह्य झाली. साहजिकच एकत्र कुटुंबपध्दती लोप पावत चालली आहे. एकाच कुटुंबात १० ते १२ जण एकत्रित रहात असल्याचे चित्रही दिसेनासे झाले असून, सध्या बहुतांशी चौकोनी अथवा षटकोनी कुटुंबांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा वाढत्या मर्यादित कुटुंबांच्या गर्दीतही जिल्ह्यात एकत्रित कुटुंबपद्धतीने राहणारे लोकही दिसून येत आहेत.पन्नासजणांचे एकत्रित कुटुंबप्रथमपासून आमच्या घरी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे वातावरण होते. सध्या आमचा ५० जणांचा परिवार आहे. एकत्रित असल्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. मुख्य म्हणजे अनुभवी वयोवृध्द माणसांकडून मुलांवर लहानपणीच संस्कार होतात. याचा त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोग होतो, असे वाळव्यातील निवृत्त माध्यमिक शिक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.२६ जणांचा परिवारसांगलीतील रामविश्वास दूध केंद्राचे चालक विवेक गवळी म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती ही संकल्पना सर्वांनी स्वीकारली पाहिजे. सध्या आम्ही कुटुंबातील २६ जण एकत्रित राहतो. यामुळे आमच्यातील संवादात भर पडली आहे. जेवण, टीव्ही पाहणे आम्ही एकत्रितच करतो. महागाई वाढत असली तरी, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे त्याचा भार आमच्यावर पडत नाही. कौटुंबिक कलहातही होत आहे वाढ....कौटुंबिक कलहातही वाढ होत आहे. शहरात असलेल्या महिला व मुले सहाय्य कक्षात महिन्याला कौटुंबिक वादविवादाच्या ३५ ते ४० तक्रारी येत आहेत. तीच परिस्थिती पोलीस मुख्यालयातील महिला कक्षातील तक्रारींची आहे. जिल्हा न्यायालयात वर्षाला सरासरी ५५० घटस्फोटाची प्रकरणे प्रविष्ट होत असून, यामध्ये लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकत्र कुटुंबपध्दती दुर्मीळ होत चालल्याने व घरात मार्गदर्शन करणाऱ्यांची उणीव जाणवत असल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी काहीजण आमच्याकडे येतात. प्रामुख्याने सासू-सुनेमधील भांडण, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. दिवसागणिक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. - राधिका सावंत आणि दत्तात्रय कोळी, समुपदेशक, महिला व मुले सहाय्य कक्ष, सांगलीविभक्त कुटुंब पध्दतीमुळे आजी-आजोबांचा मायेचा आधार गेला आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या माध्यमातून एकतर्फी, निरर्थक देवाण-घेवाण सुरू आहे. आमच्याकडे येणारी बहुतांशी प्रकरणे पती-पत्नीमधील विसंवाद, पालक आणि पाल्यामधील वाढता दुरावा तसेच नवविवाहितांमधील वाढत्या घटस्फोटाची असतात.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.घाई-गडबडीत आणि एकमेकांना पसंत नसतानादेखील लग्नाच्या बंधनात अडकल्याने वधू-वरांचे थोड्याच कालावधित एकमेकांशी पटत नाही. परिणामी विसंवाद, गैरसमज यामुळे काही महिन्यातच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याकडे कल वाढत चालला आहे. कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याचेच हे लक्षण आहे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.