शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

By admin | Updated: May 14, 2015 23:38 IST

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा

नरेंद्र रानडे - सांगली दिवसेंदिवस होत चाललेल्या गतिमान आयुष्यामुळे कित्येकांना स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. ‘मी आणि माझे’ हेच अनेकांचे भावविश्व बनल्याने विभक्त कुटुंबपध्दती अंगवळणी पडत चालली आहे. तरीही काहीजण एकत्र कुटुंब पध्दतीची संकल्पना प्रत्यक्षात जोपासत आहेत, तर दुसरीकडे विभक्त कुटुंबांमधील घटस्फोट, कौटुंबिक वादविवाद, नातेसंबंधात दुरावा यातही वाढ झाली आहे. वृध्द व्यक्ती अनेकांना ‘ओझे’ वाटत असल्याने कुपवाडच्या वृध्दाश्रमात प्रतीक्षा यादी लागली आहे. हे चित्र म्हणजे कौटुंबिक नातेसंबंधातील रेशीमबंध सैल होत चालल्याचे निदर्शक आहे. पूर्वीची वाडा संस्कृती अपार्टमेंटच्या जगात कालबाह्य झाली. साहजिकच एकत्र कुटुंबपध्दती लोप पावत चालली आहे. एकाच कुटुंबात १० ते १२ जण एकत्रित रहात असल्याचे चित्रही दिसेनासे झाले असून, सध्या बहुतांशी चौकोनी अथवा षटकोनी कुटुंबांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा वाढत्या मर्यादित कुटुंबांच्या गर्दीतही जिल्ह्यात एकत्रित कुटुंबपद्धतीने राहणारे लोकही दिसून येत आहेत.पन्नासजणांचे एकत्रित कुटुंबप्रथमपासून आमच्या घरी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे वातावरण होते. सध्या आमचा ५० जणांचा परिवार आहे. एकत्रित असल्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. मुख्य म्हणजे अनुभवी वयोवृध्द माणसांकडून मुलांवर लहानपणीच संस्कार होतात. याचा त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोग होतो, असे वाळव्यातील निवृत्त माध्यमिक शिक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.२६ जणांचा परिवारसांगलीतील रामविश्वास दूध केंद्राचे चालक विवेक गवळी म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती ही संकल्पना सर्वांनी स्वीकारली पाहिजे. सध्या आम्ही कुटुंबातील २६ जण एकत्रित राहतो. यामुळे आमच्यातील संवादात भर पडली आहे. जेवण, टीव्ही पाहणे आम्ही एकत्रितच करतो. महागाई वाढत असली तरी, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे त्याचा भार आमच्यावर पडत नाही. कौटुंबिक कलहातही होत आहे वाढ....कौटुंबिक कलहातही वाढ होत आहे. शहरात असलेल्या महिला व मुले सहाय्य कक्षात महिन्याला कौटुंबिक वादविवादाच्या ३५ ते ४० तक्रारी येत आहेत. तीच परिस्थिती पोलीस मुख्यालयातील महिला कक्षातील तक्रारींची आहे. जिल्हा न्यायालयात वर्षाला सरासरी ५५० घटस्फोटाची प्रकरणे प्रविष्ट होत असून, यामध्ये लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकत्र कुटुंबपध्दती दुर्मीळ होत चालल्याने व घरात मार्गदर्शन करणाऱ्यांची उणीव जाणवत असल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी काहीजण आमच्याकडे येतात. प्रामुख्याने सासू-सुनेमधील भांडण, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. दिवसागणिक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. - राधिका सावंत आणि दत्तात्रय कोळी, समुपदेशक, महिला व मुले सहाय्य कक्ष, सांगलीविभक्त कुटुंब पध्दतीमुळे आजी-आजोबांचा मायेचा आधार गेला आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या माध्यमातून एकतर्फी, निरर्थक देवाण-घेवाण सुरू आहे. आमच्याकडे येणारी बहुतांशी प्रकरणे पती-पत्नीमधील विसंवाद, पालक आणि पाल्यामधील वाढता दुरावा तसेच नवविवाहितांमधील वाढत्या घटस्फोटाची असतात.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.घाई-गडबडीत आणि एकमेकांना पसंत नसतानादेखील लग्नाच्या बंधनात अडकल्याने वधू-वरांचे थोड्याच कालावधित एकमेकांशी पटत नाही. परिणामी विसंवाद, गैरसमज यामुळे काही महिन्यातच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याकडे कल वाढत चालला आहे. कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याचेच हे लक्षण आहे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.