शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

By admin | Updated: May 14, 2015 23:38 IST

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा

नरेंद्र रानडे - सांगली दिवसेंदिवस होत चाललेल्या गतिमान आयुष्यामुळे कित्येकांना स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. ‘मी आणि माझे’ हेच अनेकांचे भावविश्व बनल्याने विभक्त कुटुंबपध्दती अंगवळणी पडत चालली आहे. तरीही काहीजण एकत्र कुटुंब पध्दतीची संकल्पना प्रत्यक्षात जोपासत आहेत, तर दुसरीकडे विभक्त कुटुंबांमधील घटस्फोट, कौटुंबिक वादविवाद, नातेसंबंधात दुरावा यातही वाढ झाली आहे. वृध्द व्यक्ती अनेकांना ‘ओझे’ वाटत असल्याने कुपवाडच्या वृध्दाश्रमात प्रतीक्षा यादी लागली आहे. हे चित्र म्हणजे कौटुंबिक नातेसंबंधातील रेशीमबंध सैल होत चालल्याचे निदर्शक आहे. पूर्वीची वाडा संस्कृती अपार्टमेंटच्या जगात कालबाह्य झाली. साहजिकच एकत्र कुटुंबपध्दती लोप पावत चालली आहे. एकाच कुटुंबात १० ते १२ जण एकत्रित रहात असल्याचे चित्रही दिसेनासे झाले असून, सध्या बहुतांशी चौकोनी अथवा षटकोनी कुटुंबांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा वाढत्या मर्यादित कुटुंबांच्या गर्दीतही जिल्ह्यात एकत्रित कुटुंबपद्धतीने राहणारे लोकही दिसून येत आहेत.पन्नासजणांचे एकत्रित कुटुंबप्रथमपासून आमच्या घरी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे वातावरण होते. सध्या आमचा ५० जणांचा परिवार आहे. एकत्रित असल्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. मुख्य म्हणजे अनुभवी वयोवृध्द माणसांकडून मुलांवर लहानपणीच संस्कार होतात. याचा त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोग होतो, असे वाळव्यातील निवृत्त माध्यमिक शिक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.२६ जणांचा परिवारसांगलीतील रामविश्वास दूध केंद्राचे चालक विवेक गवळी म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती ही संकल्पना सर्वांनी स्वीकारली पाहिजे. सध्या आम्ही कुटुंबातील २६ जण एकत्रित राहतो. यामुळे आमच्यातील संवादात भर पडली आहे. जेवण, टीव्ही पाहणे आम्ही एकत्रितच करतो. महागाई वाढत असली तरी, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे त्याचा भार आमच्यावर पडत नाही. कौटुंबिक कलहातही होत आहे वाढ....कौटुंबिक कलहातही वाढ होत आहे. शहरात असलेल्या महिला व मुले सहाय्य कक्षात महिन्याला कौटुंबिक वादविवादाच्या ३५ ते ४० तक्रारी येत आहेत. तीच परिस्थिती पोलीस मुख्यालयातील महिला कक्षातील तक्रारींची आहे. जिल्हा न्यायालयात वर्षाला सरासरी ५५० घटस्फोटाची प्रकरणे प्रविष्ट होत असून, यामध्ये लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकत्र कुटुंबपध्दती दुर्मीळ होत चालल्याने व घरात मार्गदर्शन करणाऱ्यांची उणीव जाणवत असल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी काहीजण आमच्याकडे येतात. प्रामुख्याने सासू-सुनेमधील भांडण, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. दिवसागणिक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. - राधिका सावंत आणि दत्तात्रय कोळी, समुपदेशक, महिला व मुले सहाय्य कक्ष, सांगलीविभक्त कुटुंब पध्दतीमुळे आजी-आजोबांचा मायेचा आधार गेला आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या माध्यमातून एकतर्फी, निरर्थक देवाण-घेवाण सुरू आहे. आमच्याकडे येणारी बहुतांशी प्रकरणे पती-पत्नीमधील विसंवाद, पालक आणि पाल्यामधील वाढता दुरावा तसेच नवविवाहितांमधील वाढत्या घटस्फोटाची असतात.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.घाई-गडबडीत आणि एकमेकांना पसंत नसतानादेखील लग्नाच्या बंधनात अडकल्याने वधू-वरांचे थोड्याच कालावधित एकमेकांशी पटत नाही. परिणामी विसंवाद, गैरसमज यामुळे काही महिन्यातच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याकडे कल वाढत चालला आहे. कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याचेच हे लक्षण आहे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.