शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या वाढीचा वेग घटला, उपाययोजनांना यश : आठ वर्षांत अडीच लाख लोकसंख्या वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:04 IST

कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये आजरा तालुका, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालल्याचे, तर ...

कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये आजरा तालुका, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालल्याचे, तर करवीर, हातकणंगले तालुक्यांमध्ये लोकसंख्येची वाढ होताना दिसत आहे.जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलैला साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्णाच्या आकडेवारीची माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या आहेत. कोल्हापूर शहराचा समावेश करवीर तालुक्यामध्ये असल्याने साहजिकच जिल्ह्णात सर्वाधिक लोकसंख्या या तालुक्याची आहे.करवीर तालुक्याची २०११ ची लोकसंख्या १० लाख ३७ हजार असून, त्यामध्ये कोल्हापूर शहराच्या साडेपाच लाख लोकसंख्येचा समावेश आहे.मात्र, कोल्हापूर शहरासह करवीर तालुका हा २0१८ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ३३ हजार ६२६ वर पोहोचला असून, गेल्या आठ वर्षांत शहर आणि तालुका मिळून ९६ हजारांनी लोकसंख्या वाढली आहे.करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये मोठी वाढ (नगरपालिका वगळून)२0११ ची लोकसंख्या आणि २0१८ चा विचार करता करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील लोकसंख्येमध्ये भरीव वाढ होताना दिसत आहे. करवीरची ५४८१३, हातकणंगले ४८00२ आणि शिरोळ १८५८0 इतकी लोकसंख्या गेल्या आठ वर्षांमध्ये वाढली आहे.शहरांपेक्षा ग्रामीण लोकसंख्येत वाढगडहिंग्लज, इचलकरंजी, वडगाव, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नऊ नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ वर्षांत ३८६८५ इतकी लोकसंख्या वाढली असून, याउलट बाराही तालुक्यांची लोकसंख्या १ लाख ७८ हजार ८४८ ने वाढली आहे.