शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे

By admin | Updated: March 7, 2016 01:31 IST

शिवाजी विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत संभ्रम; दिरंगाईचा फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --शिवाजी विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. द्वितीय सत्र (सेकंड सेमिस्टर) आले तरी, पहिल्या सत्रातील (फर्स्ट सेमिस्टर)मधील उत्तरपत्रिकेच्या विद्यापीठाकडे मागणी केलेल्या छायांकीत प्रत (फोटो कॉपी) अद्याप मिळाल्या नाहीत. फोटो कॉपी मिळणार कधी? त्यानंतर फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी आणि त्याचा निकाल येईपर्यंत द्वितीय सत्र संपणार आहे. त्यामुळे फोटो कॉपीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांत अनुुत्तीर्ण झालेले अथवा अपेक्षित गुण न मिळालेले काही विद्यार्थी उत्तरपत्रिका फेरतपासणीची मागणी करतात. यासाठी पहिल्यांदा विद्यार्थी फोटो कॉपी मागवितात. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर सात दिवसांत फोटो कॉपी देणे विद्यापीठाला बंधनकारक आहे. फोटो कॉपीमध्ये काही गुणांची वाढ दिल्यास फेरतपासणीसाठी अर्ज केला जातो. अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांना निकाल द्यावा लागतो, अशी विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, वास्तवाचा अनुभव विद्यार्थ्यांना वेगळाच आहे. असाच अनुभव अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आला. अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्रातील परीक्षांचा निकाल २७ जानेवारीला लागला. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने काहींनी फोटो कॉपीसाठी अर्ज केला. या प्रक्रियेला महिना उलटला तरी अद्याप त्यांच्या हातात काहीच पडलेले नाही. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाने सर्वच परीक्षा एक महिना अगोदर घेतल्या आहेत. अभियांत्रिकीची परीक्षा साधारणत: १५ मेपासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात; पण यावर्षी ९ ते २४ एप्रिल या कालावधीत परीक्षा संपविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षेसाठी एक महिना राहिला असताना मागील परीक्षेतील पेपरची फोटोकॉपी अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आता जरी फोटो कॉपी मिळाली तरी, फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी, त्याचा निकाल लागणार कधी, तोपर्यंत सेकंड सेमिस्टर पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, ‘फोटो कॉपी मिळेल’, एवढे साचेबद्ध व मोघम उत्तर सांगितले जाते. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराने विद्यार्थी मात्र मेटाकुटीला आले आहेत. परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिकाएखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे. परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिकाएखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे विकेंद्रीकरण केल्याने सातारा, सांगली जिल्ह्णांतील विविध केंद्रांवर पेपर असतात. जशी विद्यार्थ्यांची मागणी होईल, त्याप्रमाणे पेपर मागविले जातात. त्यामुळे उशीर होतो, पण बहुतांशी उत्तरपत्रिका पाठविलेल्या आहेत, येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळतील. - महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ तक्रारीसाठी विद्यार्थी पुढे येईनातअभियांत्रिकी विभागातील हा प्रकार एक उदाहरण आहे. अशा अनेक प्रकारांमुळे विद्यार्थी घायकुतीला येतात, पण कारवाईच्या भीतीने विद्यापीठ प्रशासनाविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे कोणी धाडस करत नाही.