शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:32 IST

कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्थाउच्च शिक्षण विभागाच्या वसतिगृहाला प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा आधार आहे. सध्या येथे सुमारे ४० विद्यार्थी राहतात. गेल्या महिन्याभरापासून या वसतिगृहातील भोजनगृह बंद आहे; त्यामुळे स्वयंपाकघर धुळीने माखले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता पसरली आहे.

भोजनगृह बंद असल्याने येथे जेवण मिळत नाही. त्याबाबत प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने बाहेरील काहीतरी खाऊन पोट भरावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या गैरसोईमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना वसतिगृहाच्या प्रशासनाला दिली; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

सहसंचालकांनी लक्ष द्यावेवसतिगृहाशी संबंधित विविध समस्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा त्रास होत आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अभ्यास करायचा की, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करायचा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी वसतिगृहातील दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कार्यालयीन कामानिमित्त मी सध्या मुंबईला आलो आहे. या वसतिगृहातील अधीक्षकांना विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची समस्या तातडीने सोडविण्याबाबतची सूचना दूरध्वनीवरून केली आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार आहे.- डॉ. अजय साळी

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर