शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

विद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:32 IST

कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्थाउच्च शिक्षण विभागाच्या वसतिगृहाला प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा आधार आहे. सध्या येथे सुमारे ४० विद्यार्थी राहतात. गेल्या महिन्याभरापासून या वसतिगृहातील भोजनगृह बंद आहे; त्यामुळे स्वयंपाकघर धुळीने माखले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता पसरली आहे.

भोजनगृह बंद असल्याने येथे जेवण मिळत नाही. त्याबाबत प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने बाहेरील काहीतरी खाऊन पोट भरावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या गैरसोईमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना वसतिगृहाच्या प्रशासनाला दिली; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

सहसंचालकांनी लक्ष द्यावेवसतिगृहाशी संबंधित विविध समस्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा त्रास होत आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अभ्यास करायचा की, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करायचा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी वसतिगृहातील दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कार्यालयीन कामानिमित्त मी सध्या मुंबईला आलो आहे. या वसतिगृहातील अधीक्षकांना विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची समस्या तातडीने सोडविण्याबाबतची सूचना दूरध्वनीवरून केली आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार आहे.- डॉ. अजय साळी

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर