शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:32 IST

कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्थाउच्च शिक्षण विभागाच्या वसतिगृहाला प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा आधार आहे. सध्या येथे सुमारे ४० विद्यार्थी राहतात. गेल्या महिन्याभरापासून या वसतिगृहातील भोजनगृह बंद आहे; त्यामुळे स्वयंपाकघर धुळीने माखले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता पसरली आहे.

भोजनगृह बंद असल्याने येथे जेवण मिळत नाही. त्याबाबत प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने बाहेरील काहीतरी खाऊन पोट भरावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या गैरसोईमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना वसतिगृहाच्या प्रशासनाला दिली; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

सहसंचालकांनी लक्ष द्यावेवसतिगृहाशी संबंधित विविध समस्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा त्रास होत आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अभ्यास करायचा की, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करायचा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी वसतिगृहातील दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कार्यालयीन कामानिमित्त मी सध्या मुंबईला आलो आहे. या वसतिगृहातील अधीक्षकांना विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची समस्या तातडीने सोडविण्याबाबतची सूचना दूरध्वनीवरून केली आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार आहे.- डॉ. अजय साळी

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर