शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बीजगणितमधील चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळात

By admin | Updated: March 12, 2016 00:33 IST

दहावीची परीक्षा : शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी

कोल्हापूर : दहावीच्या बीजगणित पेपरमधील काठिण्य पातळी अधिक असलेल्या व चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांतून होत आहे.दहावीच्या परीक्षेत मंगळवारी (दि. ८) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत बीजगणित या विषयाचा पेपर झाला. यातील प्रश्न क्रमांक पाचमधील उपप्रश्न एक आणि तीन हे खूपच वेळ घेणारे आणि अवघड होते. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांची काठिण्यपातळी खूपच जास्त होती. शिवाय उपप्रश्न क्रमांक तीन हा पाठ्यपुस्तकाबाहेरील होता. हा प्रश्न ‘एक तीन अंकी संख्या आहे. जी तिन्ही अंकांच्या बेरजेपेक्षा १७ पट आहे. जर १९८ ही संख्या दिलेल्या तीन अंकी संख्येत मिळविल्यास अंकांची अदलाबदली होते’, अशा स्वरूपाचा होता. मात्र, यात कोणत्या अंकांची अदलाबदली होते, हे स्पष्ट केले नसल्याने तसेच हा प्रश्न अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे त्यांना संबंधित प्रश्न नीट सोडविता आलेला नसल्याचे या विषयातील काही शिक्षकांनी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात पेपर झाल्यानंतर दूरध्वनीवरून माहिती दिली.विद्यार्थीहित लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा सकारात्मक निर्णय शिक्षण मंडळाने घ्यावा. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सरसकट दहा गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक, पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)प्रश्न बरोबरच : गोसावीशिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म् हणाले, बीजगणिताचा पेपर झाल्यानंतर संबंधित प्रश्नाची कल्पना विभागीय मंडळाला दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार पुण्यातील नियामक मंडळाशी मी संपर्क साधला. त्यांनी प्रश्न बरोबर असल्याचे सांगितले आहे.