शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

बीजगणितमधील चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळात

By admin | Updated: March 12, 2016 00:33 IST

दहावीची परीक्षा : शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी

कोल्हापूर : दहावीच्या बीजगणित पेपरमधील काठिण्य पातळी अधिक असलेल्या व चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांतून होत आहे.दहावीच्या परीक्षेत मंगळवारी (दि. ८) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत बीजगणित या विषयाचा पेपर झाला. यातील प्रश्न क्रमांक पाचमधील उपप्रश्न एक आणि तीन हे खूपच वेळ घेणारे आणि अवघड होते. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांची काठिण्यपातळी खूपच जास्त होती. शिवाय उपप्रश्न क्रमांक तीन हा पाठ्यपुस्तकाबाहेरील होता. हा प्रश्न ‘एक तीन अंकी संख्या आहे. जी तिन्ही अंकांच्या बेरजेपेक्षा १७ पट आहे. जर १९८ ही संख्या दिलेल्या तीन अंकी संख्येत मिळविल्यास अंकांची अदलाबदली होते’, अशा स्वरूपाचा होता. मात्र, यात कोणत्या अंकांची अदलाबदली होते, हे स्पष्ट केले नसल्याने तसेच हा प्रश्न अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे त्यांना संबंधित प्रश्न नीट सोडविता आलेला नसल्याचे या विषयातील काही शिक्षकांनी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात पेपर झाल्यानंतर दूरध्वनीवरून माहिती दिली.विद्यार्थीहित लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा सकारात्मक निर्णय शिक्षण मंडळाने घ्यावा. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सरसकट दहा गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक, पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)प्रश्न बरोबरच : गोसावीशिक्षण मंडळाचे विभागीय सचिव शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म् हणाले, बीजगणिताचा पेपर झाल्यानंतर संबंधित प्रश्नाची कल्पना विभागीय मंडळाला दूरध्वनीवरून दिली. त्यानुसार पुण्यातील नियामक मंडळाशी मी संपर्क साधला. त्यांनी प्रश्न बरोबर असल्याचे सांगितले आहे.