शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:34 IST

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक ...

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन वास्तू उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, श्री भगवानगिरी महाराज, सरपंच बाजीराव चव्हाण, कल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पाटील म्हणाले, नूल गावच्या विकासकामांची यादी करून वर्षभरात कामे मार्गी लावली जातील. गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. संपादक जाधव, अ‍ॅड. शिंदे, आमदार कुपेकर यांचीही भाषणे झाली.मंत्री तावडे यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन तर संजय थोरात लिखीत ‘विद्या दानीश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. मंत्री तावडे यांचा संस्था सचिव नानाप्पा माळगी यांच्याहस्ते सत्कार झाला. जयसिंग चव्हाण, विनोद नाईकवाडी, अभिजित चौगुले, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, संजय थोरात आदींसह संचालकांचा मंत्र्यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, किसनराव कुराडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, योगेश जाधव, जि. प. सदस्या अनिता चौगुले, सभापती जयश्री तेली, प्रांताधिकारी संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.अपघाती मृत्यू झाल्यास मोफत शिक्षणनव्या अपघात योजनेत प्रती विद्यार्थी दहा रुपये शासन विमा कंपनीकडे भरेल. विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च तर पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहितीही तावडेंनी यावेळी दिली.