शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

विद्यार्थी अपघात विमा अडकला ‘लालफितीत’

By admin | Updated: October 17, 2014 00:52 IST

जिल्ह्यातील स्थिती : तब्बल ५३ जण मदतीच्या प्रतीक्षेत; आतापर्यंत केवळ दोघांनाच लाभ

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -जिल्हा परिषदेने या वर्षापासून स्वनिधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी अपघात विमा’ योजना सुरू केली. मात्र, योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ दोनच विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत विम्याचे पैसे पोहोचले आहेत. जूननंतर आलेल्या जिल्ह्यातील सर्व ५३ अपघात विम्याचे प्रस्ताव ‘लाल फिती’मध्येच अडकले आहेत. त्यातील २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, अजूनही लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचलेले नाहीत. उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या चक्रव्यूहामध्येच अडकले आहेत.येथील जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीत असलेल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांतील मुलांसाठी विद्यार्थी अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेतून शाळेच्या वेळेत आवारात व मैदानात खेळताना किंवा अन्य कारणांमुळे विद्यार्थ्याला दुखापत झाल्यास उपचारासाठी अधिकाधिक पाच हजार रुपये, तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास दहा हजार रुपये स्वनिधीतून उपचारासाठी जिल्हा परिषदेकडून दिले जातात. संबंधित प्रस्ताव तालुका पातळीवरून जिल्हा परिषदेकडे पाठविले जातात. जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर त्यांची छाननी केली जाते. पडताळणी करून जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्मििती बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जाते. समितीच्या बैठकीत प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर लेखा विभागाकडून मंजुरी घेऊन संबंधित प्रस्तावाचे पैसे मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. मुख्याध्यापकांनी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे देणे अपेक्षित आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे येत आहेत. पहिल्या टप्प्यात आलेल्या करवीर, कागल या दोन तालुक्यांतील विद्यार्थ्याला प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे मदत मिळाली आहे. दरम्यान, मे, जून महिन्यांत जिल्ह्यातून २६ प्रस्ताव आले. या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. अंतिम टप्प्यात प्रक्रिया आली असताना लोकसभा आणि आता सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रस्तावाच्या पुढील मंजुरीलाच ‘ब्रेक’ लागला. परिणामी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव येऊन पाच महिने झाले तरी प्रत्यक्षात अजूनही संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे मिळाले नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने २७ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले आहेत. तेही विविध टप्प्यांत प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थी अपघात विम्याचा फायदा जखमी विद्यार्थ्यांना होत नसल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिक मदतीसाठी पालक शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांच्याकडे विचारणा करीत आहेत. समाधानकारक आणि ठोस उत्तर मिळत नसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे पालक नाराज होत आहेत. तालुकानिहाय आतापर्यंत प्रलंबित आणिकंसात जिल्हा परिषदेने मंजुरी दिलेल प्रस्ताव आजरा (१५)गडहिंग्लज- १ (२)पन्हाळा - ८ (३)हातकणंगले - ३ (२),करवीर - ३ (२)राधानगरी - ५ (१),कागल - २ (१)शिरोळ - ५.