शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

काळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 11:47 IST

धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देकाळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्याअतिरिक्त जमिनीच्या पाठविलेल्या नोटिसा मागे घ्या

कोेल्हापूर : धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.दुपारी एकच्या सुमारास टाऊन हॉल उद्यान येथून धरणग्रस्तांच्या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत हा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोलपंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर बाबूराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, आपले संसार फोंड्या माळावर मांडून दुसऱ्याचे संसार फुलविण्यासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची कुचेष्टा सुरू आहे. २००१ पासून आतापर्यंतच्या धरणग्रस्तांच्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर वेळोवेळी धरणग्रस्तांनी आवाज उठविला असता वेगवेगळे निकष काढण्यात आले. त्यामुळे संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात संकलन दुरुस्तीसाठी जनहित याचिका दाखल केली.

यामध्ये पुणे विभागीय आयुक्तांना संकलन दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आयुक्तांनी जिल्हाधिकारी व धरणग्रस्तांची बैठक घेऊन बुडीत असलेले पुरावे व नियत दिनांकावेळी कुटुंबातील लोकसंख्येचे पुरावे घेऊन संकलन दुरुस्तीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे संकलन दुरुस्ती झाली. त्याचबरोबर ३० टक्के दुरुस्तीचे काम अपूर्ण असताना प्रशासन धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी कमी करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. हे चुकीचे असून त्या तत्काळ मागे घ्याव्यात.आंदोलनात विठ्ठल चव्हाण, बाबूराव कांबळे, नाथा पाटील, विजय पाटील, श्रावण पाटील, मारुती पाटील, सुनील धोंड, ऐश्वर्या निरुखेकर, वंदना पाटील, छाया पाटील, आदींसह सहभागी झाल्या होत्या. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर