शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 11:47 IST

धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देकाळम्मावाडी धरणग्रस्तांचा धडक मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्याअतिरिक्त जमिनीच्या पाठविलेल्या नोटिसा मागे घ्या

कोेल्हापूर : धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी काढून घेतल्यास आत्मदहन करू, असा इशाराही अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी दिला.दुपारी एकच्या सुमारास टाऊन हॉल उद्यान येथून धरणग्रस्तांच्या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत हा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोलपंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर बाबूराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, आपले संसार फोंड्या माळावर मांडून दुसऱ्याचे संसार फुलविण्यासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांची कुचेष्टा सुरू आहे. २००१ पासून आतापर्यंतच्या धरणग्रस्तांच्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसांवर वेळोवेळी धरणग्रस्तांनी आवाज उठविला असता वेगवेगळे निकष काढण्यात आले. त्यामुळे संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात संकलन दुरुस्तीसाठी जनहित याचिका दाखल केली.

यामध्ये पुणे विभागीय आयुक्तांना संकलन दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आयुक्तांनी जिल्हाधिकारी व धरणग्रस्तांची बैठक घेऊन बुडीत असलेले पुरावे व नियत दिनांकावेळी कुटुंबातील लोकसंख्येचे पुरावे घेऊन संकलन दुरुस्तीचे आदेश दिले. त्याचप्रमाणे संकलन दुरुस्ती झाली. त्याचबरोबर ३० टक्के दुरुस्तीचे काम अपूर्ण असताना प्रशासन धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून न घेता जमिनी कमी करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. हे चुकीचे असून त्या तत्काळ मागे घ्याव्यात.आंदोलनात विठ्ठल चव्हाण, बाबूराव कांबळे, नाथा पाटील, विजय पाटील, श्रावण पाटील, मारुती पाटील, सुनील धोंड, ऐश्वर्या निरुखेकर, वंदना पाटील, छाया पाटील, आदींसह सहभागी झाल्या होत्या. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर