शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:30 IST

जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कर्नाटक राज्य शासनाने खबरदारी म्हणून सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत. यानंतर आता कोल्हापूरचे प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.कोविड- 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी आदेश बाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.सद्यस्थितीत कोल्हापुरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर उपचारातील रुग्ण संख्या देखील ५० च्या खाली येवून पोहचली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज पासून महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या विरोधात कारवाईची मोहिम देखील सुरु केली आहे.कोल्हापुरात कडक निर्बंध करण्याआधीच कर्नाटक प्रशासनाने सीमेवर टोलनाक्यावर तपासणी नाके उभा केले आहेत. तपासणीनंतर प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. यात सीमाभागातील नागरिक तसेच कर्नाटक राज्याबाहेर पुढील राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे.आजरा, गडहिंग्लज, चंदगडकराना सवलतकोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यांना जाण्यासाठी कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करावा लागतो. आरटीपीसीआर सक्तीमुळे या तालुक्यातील प्रवाशांच्या जिल्ह्यांतर्गत प्रवासावरच निर्बंध आले होते. परंतु या प्रवाशांच्या रहिवासी पुराव्यांची खातरजमा करून त्यांच्या प्रवासास सवलत देण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली आहे.

कोल्हापूर प्रवेशासाठी हे आहेत नियम...- व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण म्हणजेे लसीचा दुसरा डोस होऊन १४ दिवस झाले असतील तर- १० वर्षाखालील व्यक्तींचा वयाचा पुरावा- वैद्यकीय कारणास्तव लस घेतली नसेल तर नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र- वरील कागदपत्रे नसतील तर ७२ तासांच्या आतील निगेटिव्ह रिपोर्ट

रुमाल, एकपदरी मास्क असेल तर दंडहा व्हायरस अधिक प्रभावी असल्याने प्रत्येकाकडे एन ९५ मास्क, तीनपदरी मास्क किंवा सर्जिकल तीनपदरी मास्क असेल तरच मास्क घातला असे समजले जाईल. रुमाल किंवा एकपदरी मास्क असेल तर मास्क घातलेला नाही असे समजून ५०० रुपयांचा दंड केला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन