शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

By admin | Updated: November 15, 2014 00:05 IST

पावसाने पळापळ : शेतकरी हवालदिल

सातारा : अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या हंगामात स्ट्रॉबेरी चढ्या दराने बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान, ऐन नोव्हेंबरात अचानक पडलेल्या पावसामुळे सातारा शहरातही नागरिकांची पळापळ उडाली.महाबळेश्वर, पाचगणीसह जावळी खोऱ्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. स्ट्रॉबेरी हिवाळ्यात येणारे फळ आहे. आॅक्टोबरनंतर या रोपांना स्ट्रॉबेरीची फळे लागतात. आता शेतात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे फळ दिसू लागले होते. यंदा थंडीचा मोसम व्यवस्थित आल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले राहणार, असा शेतकऱ्यांचा कयास होता. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी धास्तावला होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळ शेतातच खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणही स्ट्रॉबेरीसाठी घातक असते. स्ट्रॉबेरीत अ, ब, क ही जीवनसत्त्व आढळतात. त्यात १०.५ टक्के ग्लुकोजचे प्रमाण असते. अल्प अ‍ॅसिडिक लेवल असलेल्या या फळात सुमारे २०० बिया असतात. शरीरातील विषारी द्रव्य नष्ट करण्यासाठी या बिया उपयुक्त असतात. गुलाब वर्गीय असलेले हे एकमेव थंडीत येणारे फळ आहे. मोठी मागणी असताना आणि दरही चांगला असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आला आहे.द्राक्ष उत्पादक अडचणीतसातारा तालुक्यासह कोरेगाव, वाई, भुर्इंज, मायणी या परिसरातही पावसाने हजेरी लावली. मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, सातारा शहरात सकाळपासून कधी भुरभूर तर कधी सरी येत असल्याने नागरिकांना स्वेटरबरोबरच रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले.