शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

स्ट्रॉबेरीवर ‘अवकळा’

By admin | Updated: November 15, 2014 00:05 IST

पावसाने पळापळ : शेतकरी हवालदिल

सातारा : अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या हंगामात स्ट्रॉबेरी चढ्या दराने बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान, ऐन नोव्हेंबरात अचानक पडलेल्या पावसामुळे सातारा शहरातही नागरिकांची पळापळ उडाली.महाबळेश्वर, पाचगणीसह जावळी खोऱ्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. स्ट्रॉबेरी हिवाळ्यात येणारे फळ आहे. आॅक्टोबरनंतर या रोपांना स्ट्रॉबेरीची फळे लागतात. आता शेतात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे फळ दिसू लागले होते. यंदा थंडीचा मोसम व्यवस्थित आल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले राहणार, असा शेतकऱ्यांचा कयास होता. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी धास्तावला होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे फळ शेतातच खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणही स्ट्रॉबेरीसाठी घातक असते. स्ट्रॉबेरीत अ, ब, क ही जीवनसत्त्व आढळतात. त्यात १०.५ टक्के ग्लुकोजचे प्रमाण असते. अल्प अ‍ॅसिडिक लेवल असलेल्या या फळात सुमारे २०० बिया असतात. शरीरातील विषारी द्रव्य नष्ट करण्यासाठी या बिया उपयुक्त असतात. गुलाब वर्गीय असलेले हे एकमेव थंडीत येणारे फळ आहे. मोठी मागणी असताना आणि दरही चांगला असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आला आहे.द्राक्ष उत्पादक अडचणीतसातारा तालुक्यासह कोरेगाव, वाई, भुर्इंज, मायणी या परिसरातही पावसाने हजेरी लावली. मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, सातारा शहरात सकाळपासून कधी भुरभूर तर कधी सरी येत असल्याने नागरिकांना स्वेटरबरोबरच रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले.