शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

कर्जमाफीवरून अधिवेशन बंद पाडू : हसन मुश्रीफ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:11 IST

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही,

ठळक मुद्देप्रतापसिंह चव्हाण यांच्या कामाने जिल्हा बँकेला पुनर्वैभव बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय

कोल्हापूर : शेतकरी कर्जमाफीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑातील ऊसकरी शेतकºयाला लाभ मिळालेला नाही, यासाठी शासन नियमांत बदल करण्याची गरज आहे. ते न झाल्यास दि. ११ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.शाहूपुरीतील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, भैया माने, सर्जेराव पाटील-पेरिडकर, आर. के. पोवार, उदयानी साळुंखे, अशोक चराटी, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने दि. १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणारे शेतकरी समाविष्ट केले आहेत; परंतु ऊसकरी शेतकरी हे १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कर्ज भरतात. त्यामुळे त्यांंना कर्जमाफीचा लाभ होवू शकत नाही. त्यासाठी सरकारला नियम बदलावे लागतील, अधिवेशन सुरू होईपर्यंत यासाठी वाट पाहू, अन्यथा ११ डिसेंबरपासून सुरू होणारे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊ देणार नाही.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी चांगले काम करून बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याचे गौरवोदगार मुश्रीफ यांनी काढले. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अनेकवेळा कठोर निर्णय घेतले. त्यांच्या या शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळे त्यांनी मार्चपर्यंत थांबून बँकेच्या ठेवी ६००० कोटींपर्यंत न्याव्यात, कर्मचाºयांचा बोनस यासह विविध विषय हाती घेऊन बॅँकेच्या वैभवात आणखी भर पाडावी अशी इच्छा होती, परंतु त्यांना सांगली जिल्हा बँकेकडे जाणे क्रमप्राप्त आहे, तरीही त्यांनी या बँकेकडे लक्ष द्यावे.बँक अडचणीतून बाहेर : प्रतापसिंह चव्हाणप्रतापसिंह चव्हाण म्हणाले, जिल्हा बँकेसाठी आपल्याला शक्य होते तितके योगदान देऊन ती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. एप्रिल २०१२ मध्ये बँकेच्या प्रशासकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर असणारे उणे नेटवर्थ, उणे सी.आर.ए.आर., निधीची चणचण, एनपीएचे प्रमाण, संचित तोटा अशा बाबींवर मात करत सर्व संचालकांसह कर्मचाºयांच्या सहकाºयाने मार्च २०१७ चा ताळेबंद आपण रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या निकषांप्रमाणे काढू शकलो. त्याचबरोबर बँकेस सीआरएआर १०.७ ठेवून जिल्हा बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून असणारा परवाना अबाधित ठेवू शकलो याबाबत समाधानी आहे.सीईओपदी शिवाजी वाघ यांच्या नावाचा ठरावबॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे सांगली जिल्हा बॅँकेत रुजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे सरव्यवस्थापक शिवाजी ठकराम वाघ यांची नियुक्ती व्हावी, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तशी मागणी करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.