शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील कावळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील कावळा नाक्यावरील ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरातील सकल मराठा समाजाच्या पमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. १६ जूनला झालेल्या मूक आंदोलनानंतर मुंबईत सरकारशी झालेल्या निर्णयाबंधी चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन तेवत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी रास्ता रोको करण्यात येईल. यासाठी प्रत्येकांनी कमीत कमी ५० कार्यकर्ते घेऊन यावेत. मराठा आरक्षणाच्या लढ्याचा केंद्रबिंदू शिवाजी पेठच राहील. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यासाठी ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी मागणी शहरातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येईल.

किसन भोसले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवताना त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे.

अनिल घाटगे म्हणाले, राज्य सरकारला एका दिवसात सगळ्या मागण्या सोडवणे शक्य नाही. आता सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

आर. के. पोवार म्हणाले, मुंबईच्या बैठकीत सरकारने सात मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे सकारात्मक आहेत.

बैठकीत निवास साळोखे, बाबा पार्टे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, बाबा इंदूलकर यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेला छेद देणारी व या प्रश्नातील भाजपच्या भूमिकेला बळ देणारीच भूमिका मांडली. सरकारशी खासदार संभाजीराजे यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ठोस काहीही झालेले नाही. त्यामुळे पुन्हा लढल्याशिवाय मराठा समाजाला काहीही मिळणार नाही. घाईने बैठक घेऊन संभाजीराजेंना राज्यकर्त्यांनी फसवले आहे. यामुळे त्यांनी राज्यकर्त्यांऐवजी समाजावर अधिक विश्वास ठेवावा. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन झाले. त्यावेळी ठरवण्यात आलेल्या आचारसंहितेचे पालन झाले नाही. राजेंनी राज्य सरकारशी चर्चा करण्यास गडबड केली. बैठकीत ठोस काही निर्णय होतील, असे वाटत होते. पण तसे झालेले नाही. कोणाच्या तरी हट्टापायी एका रात्रीत बैठक झाली, हे चुकीचे आहे. आम्ही मराठा आरक्षणाचे नेतृत्व संभाजीराजेंकडे साेपवले आहे. पण आम्हाला त्यांच्या मागे ओढत जाणे शक्य नाही, अशा भावना या कार्यकर्त्यांनी मांडल्या. यावेळी जयेश कदम, दिलीप देसाई, रविकिरण इंगवले यांची भाषणे झाली. प्रकाश घाटगे, दुर्गेश लिंग्रज, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

चौकट

ओबीसीतून आरक्षण द्या

अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, मराठा समाजास मूक आंदोलनाने काही मिळणार नाही. म्हणून यापुढे समाजाने मूक आंदोलन करू नये. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळू शकते. पण याकडे राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांची अडचण आहे. म्हणून आम्ही आता ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी केली पाहिजे.