शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. या ...

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चातर्फे शनिवारी (२६ जून) शहर आणि जिल्ह्यात महसूल मंडलनिहाय रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली. या आंदोलनात सर्व पक्षातील ओबीसी नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेस भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगूनही राज्य सरकारने ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला नाही. सरकारच्या अशा निष्काळजीपणामुळे ३४६ उपजाती असलेल्या ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाले. मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासही त्यांनी जाणीवपूर्वक विलंब लावला. अशाप्रकारे सरकारची भूमिका राहिली तर ओबीसींचे नोकरी आणि शिक्षणातीलही आरक्षण संपू शकते.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमानीपणे ७ मे २०२१ रोजी पदोन्नतीमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला. या आदेशाला सरकारमधील काँग्रेसचे नेते विरोध करू शकले नाहीत. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार भाजप सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले होते. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात तेही टिकवता आले नाही. सरकार जातीजातींमध्ये भांडणे लावत आहे. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलून जबाबदारी झटकत आपला बचाव करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यातही सरकारला यश आलेले नाही. परिणामी अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे भाजपतर्फे सरकारच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

पवार यांच्या राजकारणाचा अस्त जवळ..

सरकारमध्ये काका, पुतण्याचाच कारभार सुरू आहे. ते जातीयवादी, भ्रष्ट कामकाज करीत आहेत. स्वत:च्या कुटुंबांतील सदस्यांच्या प्रगतीसाठीच ते प्रयत्नशील आहेत. शरद पवार स्वत: राजकीय चाणक्य समजत असताना ते भाडोत्री राजकीय चाणक्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जात आहेत, यावरून त्यांच्या राजकारणाचा अस्त जवळ आला आहे, असे जाणवत आहे.