शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'सूळकूड’ पाणी योजनेचा हट्ट सोडा, अन्यथा रक्तपात मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

By राजाराम लोंढे | Updated: August 26, 2023 22:09 IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विराट मोर्चाचे नियोजन, इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्ट

राजाराम लोंढेकाेल्हापूर : इचलकरंजी महापालिकेने सूळकूड पाणी योजनेऐवजी ‘कृष्णा’ नदीवरून सुरू असलेली पाणी योजनाच पूर्ण करावी. सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने इचलकरंजीवासीयांनी ‘सूळकूड’ योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिला. याबाबत दोन दिवसांत आपण व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांना लोकभावना सांगू, तरीही निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून रस्त्यावरील लढाईस सुरुवात करूया, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्र्यानेच रक्तपाताची भाषा जाहीरपणे केल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते, त्यामध्ये मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीसाठी ‘कृष्णा’ नदीवरून नवीन १६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, केवळ ७ किलोमीटरचे काम राहिले असून ‘सूळकूड’साठी मंजूर झालेला निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी वापरावा. ‘सूळकूड’मधून पाणी देण्याचा विषय संपला आहे, त्यावर आता कोणीही चर्चाच करू नये.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध नाही, पण ते दूधगंगेतून देता येणार नाही. ‘धामणी’तून पाणी मिळणार असून पंचगंगेच्या प्रदूषणाबाबतही लवकरच निर्णय घेऊ. ११ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावल्याचे समजते, त्याच दिवशी विराट मोर्चा काढूया.

 ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे राजकारण सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय वेदना कळणार नाहीत.कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील ६७ गावे दूधगंगेच्या कार्यक्षेत्रात आहेत. या योजनेचा आम्हाला अधिक फटका बसणार असून तुमच्या लढ्यात सीमाभागातील बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतील.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दूधगंगा बचाव कृती समितीचे निमंत्रक के.पी. पाटील, अंबरीश घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार प्रकाश आबीटकर, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, वीरेंद्र मंडलिक, अनिल ढवण, भूषण पाटील, सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.

इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्टसूळकूड योजना रद्द झालीच पाहिजे, त्याचबरोबर दूधगंगेच्या गळतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ‘दूधगंगा’ धरणाचा मूळ आराखडा तपासण्याची वेळी आली असून इचलकरंजीच्या जनतेची मागणी नाही, तेथील नेत्यांचा हट्ट असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले.

तुमची घाण धुण्यासाठी धरण बांधले का?

आमदार असताना जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रकाश आवाडे हे पंचगंगा धुण्यासाठी पाणी सोडण्याचे आग्रह करत होते. पण, तुमची घाण धुण्यासाठी आमच्या आईबाबाने धरण बांधले का, असा सवाल के. पी. पाटील यांनी केला. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर