शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

'सूळकूड’ पाणी योजनेचा हट्ट सोडा, अन्यथा रक्तपात मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

By राजाराम लोंढे | Updated: August 26, 2023 22:09 IST

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विराट मोर्चाचे नियोजन, इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्ट

राजाराम लोंढेकाेल्हापूर : इचलकरंजी महापालिकेने सूळकूड पाणी योजनेऐवजी ‘कृष्णा’ नदीवरून सुरू असलेली पाणी योजनाच पूर्ण करावी. सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने इचलकरंजीवासीयांनी ‘सूळकूड’ योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिला. याबाबत दोन दिवसांत आपण व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांना लोकभावना सांगू, तरीही निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून रस्त्यावरील लढाईस सुरुवात करूया, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्र्यानेच रक्तपाताची भाषा जाहीरपणे केल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते, त्यामध्ये मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीसाठी ‘कृष्णा’ नदीवरून नवीन १६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, केवळ ७ किलोमीटरचे काम राहिले असून ‘सूळकूड’साठी मंजूर झालेला निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी वापरावा. ‘सूळकूड’मधून पाणी देण्याचा विषय संपला आहे, त्यावर आता कोणीही चर्चाच करू नये.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध नाही, पण ते दूधगंगेतून देता येणार नाही. ‘धामणी’तून पाणी मिळणार असून पंचगंगेच्या प्रदूषणाबाबतही लवकरच निर्णय घेऊ. ११ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावल्याचे समजते, त्याच दिवशी विराट मोर्चा काढूया.

 ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे राजकारण सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय वेदना कळणार नाहीत.कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील ६७ गावे दूधगंगेच्या कार्यक्षेत्रात आहेत. या योजनेचा आम्हाला अधिक फटका बसणार असून तुमच्या लढ्यात सीमाभागातील बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतील.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दूधगंगा बचाव कृती समितीचे निमंत्रक के.पी. पाटील, अंबरीश घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार प्रकाश आबीटकर, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, वीरेंद्र मंडलिक, अनिल ढवण, भूषण पाटील, सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.

इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्टसूळकूड योजना रद्द झालीच पाहिजे, त्याचबरोबर दूधगंगेच्या गळतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ‘दूधगंगा’ धरणाचा मूळ आराखडा तपासण्याची वेळी आली असून इचलकरंजीच्या जनतेची मागणी नाही, तेथील नेत्यांचा हट्ट असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले.

तुमची घाण धुण्यासाठी धरण बांधले का?

आमदार असताना जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रकाश आवाडे हे पंचगंगा धुण्यासाठी पाणी सोडण्याचे आग्रह करत होते. पण, तुमची घाण धुण्यासाठी आमच्या आईबाबाने धरण बांधले का, असा सवाल के. पी. पाटील यांनी केला. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर