शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर कामकाज थांबवा, दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:56 IST

कुलगुरूंचा मनमानी कारभार, पदवी प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरण, बाहेरील विद्यापीठांतील उमेदवारांच्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या करणे, आदींमुळे शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत आहे. या चुकांची दुरुस्ती करावी. बेकायदेशीर कामकाज थांबवावे, संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कुलगुुरूंनी कारवाई करावी, अशी शिवाजी विद्यापीठ बचाव कृती समितीची मागणी आहे, अशी माहिती या समितीचे निमंत्रक मंदार पाटील यांनी येथे दिली.

ठळक मुद्देबेकायदेशीर कामकाज थांबवा, दोषींवर कारवाई कराशिवाजी विद्यापीठ बचाव कृती समितीची मागणी; आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : कुलगुरूंचा मनमानी कारभार, पदवी प्रमाणपत्र दुबार छपाई प्रकरण, बाहेरील विद्यापीठांतील उमेदवारांच्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या करणे, आदींमुळे शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत आहे. या चुकांची दुरुस्ती करावी. बेकायदेशीर कामकाज थांबवावे, संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कुलगुुरूंनी कारवाई करावी, अशी शिवाजी विद्यापीठ बचाव कृती समितीची मागणी आहे, अशी माहिती या समितीचे निमंत्रक मंदार पाटील यांनी येथे दिली.विद्यापीठाची बदनामी थांबविण्यासाठी, बेकायदेशीर कामकाज रोखण्यासाठी कोल्हापूरमधील विविध १३ संघटनांनी एकत्रित येऊन ‘शिवाजी विद्यापीठ बचाव कृती समिती’ स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक झाल्यानंतर त्यातील निर्णयाची माहिती देताना निमंत्रक पाटील म्हणाले, पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई आणि एका सहीच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या बदनामीस कुलगुरूंचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे.

माजी कुलसचिव मुळे यांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा. त्यातील दोषींवर कारवाई करावी. विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या आणि अर्हताधारक उमेदवारांना जाणीवपूर्वक विविध पदांवर संधी देण्याऐवजी बाहेरील विद्यापीठातील उमेदवारांच्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या करणे, आदी बेकादेशीर प्रकरणामुळे विद्यापीठाची नाहक बदनामी होत आहे, ती थांबवावी. बेकायदेशीर कामकाज करू नये.

आतापर्यंतच्या बेकायदेशीर प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी येत्या दोन दिवसांत समितीचे शिष्टमंडळ कुलगुरूंची भेट घेणार आहे. या मागणीनुसार त्यांनी कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. या बैठकीस डी. एन. पाटील, महेश राठोड, ऋतुराज माने, नवनाथ मोरे, पंकज खोत, अभिजित राऊत, संदीप दाभोळकर, बोधिसत्त्व माने, आनंद खामकर, अक्षय मोरे, रोहित पाटील, पार्थ मुंडे, अक्षय साळवी, अमोल कुरणे, अमोल कांबळे, प्रसाद उगवे, भगवान सोनद, आदी उपस्थित होते.

कृती समितीतील संघटनाया कृती समितीत मनविसे, विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी ककृती समिती, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया, आरपीआय (ए), विद्यापीठ शिक्षक संघ, राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, भाजप युवा मोर्चा प्रदेश, राष्ट्रवादी युवक, ‘एनएसयूआय’, लहुजी साळवे प्रतिष्ठान, परिवर्तनवादी संघटना, राज्य महाविद्यालयीन अशासकीय शिक्षकेतर संघटना यांचा समावेश आहे.

समितीने केलेले आरोप

  1. पदवी प्रमाणपत्रांतील चुकांची दुरुस्ती न करणे.
  2.  गेस्ट हाऊसचे खासगीकरण करणे.
  3.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर कारभार.
  4.  विधि परीक्षेबाबतच्या मागणीकडे दुर्लक्ष.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर