शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

................ भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले ...

................

भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले उचलली. आज सावित्रीच्या लेकी होऊन अनेक संकंटाना तोंड देत महिला स्वत:च्या व इतर स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटत आहेत. आजची 'स्त्री' आत्मनिर्भर आहे. ती स्वत:चे निर्णय स्व:त घेऊ शकते. आपण या समाजाचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव तिला सतत असते. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता आहे. त्यामुळे कुटुंबातील व समाजातील जबाबदारी निभावताना तिच्यातील शक्‍तीस्वरूपाबरोबरच प्रेम, सहनशीलता, संवेदनशीलता या गुणांमुळेच ती कोणत्याही क्षेत्रात असली तरी चांगल्या रितीने व्यवस्थापन करू शकते. यासाठी गरज आहे तिचे मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे, पहिल्या आय.पी. एस्‌. अधिकारी किरण बेदी म्हणतात, ‘गतिक्षमता किंवा काळाबरोबर बदलणे, शारीरिक व मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टी महिलांना सक्षम बनवितात. स्त्रियांनी यादृष्टीने स्वत:च प्रयत्न करणे आवश्यक असते. कोणतेही काम करीत असताना तुलना, टीका होत असते, त्यावेळी दुर्लक्ष करून स्वत:च्या घ्येय मार्गावर अढळ राहिले पाहिजे. त्याचबरोबर कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्‍वासपूर्वक घेऊन त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. एखादी स्त्री पुढे जात असली, तर पाठिंबा न देता मानसिक खच्चीकरण करणारे जागोजागी जास्त भेटतात. अशावेळी स्त्रियांनी शक्यतो मानसिक त्रासापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरी असो वा ग्रामीण स्वत:च्या आरोग्याविषयी फार कमी प्रमाणात स्त्रिया दक्ष असतात. मातृत्वानंतर कुटुंबीय व मुले, जबाबदाऱ्या यामुळे त्या स्वत:च्या आरोग्याला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यातून मोलमुजरी करणाऱ्या, वाड्यातांड्यावरच्या, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची फार हेळसांड होत असते. गंभीर स्थिती झाल्यावरच त्या आरोग्याकडे लक्ष देतात. कुटुंब, आपली नोकरी, व्यवसाय याची सांगड घालताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योग, ध्यान, धारणा किंवा 'एखादा व्यायाम, सकस अन्न यांचा अवलंब करुन चांगले ठेवणे आवश्यक आहे.

आज आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षमीकरणाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बचतगट, व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्जे, मोफत व्यवसाय प्रशिक्षण, यंत्रे, मुलींना फी माफी याद्वारे तसेच महिला स्वत: नोकरी, व्यवसाय, कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. जितक्या महिला करिअरला महत्त्व देतील तितके घरातील जबाबदारीचे भान पुरुषांनाही येईल, ही जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे. महिलांचे प्रश्‍न प्रचंड आहेत. एरवी सोयीस्कररित्या दुर्लक्ष व केल्या जाणाऱ्या, दररोज होणारे स्त्रियांवरील अत्याचार, लिंगभेद, स्त्री-भूणहत्या, हुंडाबळी या 'प्रश्‍नांना मोठ्या प्रमाणावर वाचा फोडण्याचे काम महिला दिनानिमित्त घडते. त्यामुळे महिला दिन गांभीर्याने साजरा करण्याची आवश्यकता आहे. जागतिक महिला दिन साजरा होणे गरजेचे आहे. कारण न संपणारी आशा व उमेद.

वर्तमान काळात स्त्रीला घरातील व आर्थिक सक्षमतेसाठी, कुटुंबियांसाठी बाहेरील अशा दोन्ही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. बदलताना स्त्रियांनीही कुटुंब व समाज यांचा विचार करून कितपत बदलायचे, किती तडजोडी करावयाच्या आणि मनासारखे कितपत वागावयाचे, हे निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण स्त्रियांमुळेच कुटुंब व समाज या संस्था अबाधित आहेत.

- अनिशा अनिल कोटगी