शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

................ भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले ...

................

भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले उचलली. आज सावित्रीच्या लेकी होऊन अनेक संकंटाना तोंड देत महिला स्वत:च्या व इतर स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटत आहेत. आजची 'स्त्री' आत्मनिर्भर आहे. ती स्वत:चे निर्णय स्व:त घेऊ शकते. आपण या समाजाचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव तिला सतत असते. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता आहे. त्यामुळे कुटुंबातील व समाजातील जबाबदारी निभावताना तिच्यातील शक्‍तीस्वरूपाबरोबरच प्रेम, सहनशीलता, संवेदनशीलता या गुणांमुळेच ती कोणत्याही क्षेत्रात असली तरी चांगल्या रितीने व्यवस्थापन करू शकते. यासाठी गरज आहे तिचे मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे, पहिल्या आय.पी. एस्‌. अधिकारी किरण बेदी म्हणतात, ‘गतिक्षमता किंवा काळाबरोबर बदलणे, शारीरिक व मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टी महिलांना सक्षम बनवितात. स्त्रियांनी यादृष्टीने स्वत:च प्रयत्न करणे आवश्यक असते. कोणतेही काम करीत असताना तुलना, टीका होत असते, त्यावेळी दुर्लक्ष करून स्वत:च्या घ्येय मार्गावर अढळ राहिले पाहिजे. त्याचबरोबर कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्‍वासपूर्वक घेऊन त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. एखादी स्त्री पुढे जात असली, तर पाठिंबा न देता मानसिक खच्चीकरण करणारे जागोजागी जास्त भेटतात. अशावेळी स्त्रियांनी शक्यतो मानसिक त्रासापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरी असो वा ग्रामीण स्वत:च्या आरोग्याविषयी फार कमी प्रमाणात स्त्रिया दक्ष असतात. मातृत्वानंतर कुटुंबीय व मुले, जबाबदाऱ्या यामुळे त्या स्वत:च्या आरोग्याला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यातून मोलमुजरी करणाऱ्या, वाड्यातांड्यावरच्या, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची फार हेळसांड होत असते. गंभीर स्थिती झाल्यावरच त्या आरोग्याकडे लक्ष देतात. कुटुंब, आपली नोकरी, व्यवसाय याची सांगड घालताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योग, ध्यान, धारणा किंवा 'एखादा व्यायाम, सकस अन्न यांचा अवलंब करुन चांगले ठेवणे आवश्यक आहे.

आज आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षमीकरणाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बचतगट, व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्जे, मोफत व्यवसाय प्रशिक्षण, यंत्रे, मुलींना फी माफी याद्वारे तसेच महिला स्वत: नोकरी, व्यवसाय, कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. जितक्या महिला करिअरला महत्त्व देतील तितके घरातील जबाबदारीचे भान पुरुषांनाही येईल, ही जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे. महिलांचे प्रश्‍न प्रचंड आहेत. एरवी सोयीस्कररित्या दुर्लक्ष व केल्या जाणाऱ्या, दररोज होणारे स्त्रियांवरील अत्याचार, लिंगभेद, स्त्री-भूणहत्या, हुंडाबळी या 'प्रश्‍नांना मोठ्या प्रमाणावर वाचा फोडण्याचे काम महिला दिनानिमित्त घडते. त्यामुळे महिला दिन गांभीर्याने साजरा करण्याची आवश्यकता आहे. जागतिक महिला दिन साजरा होणे गरजेचे आहे. कारण न संपणारी आशा व उमेद.

वर्तमान काळात स्त्रीला घरातील व आर्थिक सक्षमतेसाठी, कुटुंबियांसाठी बाहेरील अशा दोन्ही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. बदलताना स्त्रियांनीही कुटुंब व समाज यांचा विचार करून कितपत बदलायचे, किती तडजोडी करावयाच्या आणि मनासारखे कितपत वागावयाचे, हे निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण स्त्रियांमुळेच कुटुंब व समाज या संस्था अबाधित आहेत.

- अनिशा अनिल कोटगी