शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पावणेसात लाख शेतकऱ्यांचे राज्यपालांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन ...

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रविवारी मुंबई येथे देण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांतील लाखो शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. देशातील सर्वच राज्यांतून या आंदोलनास शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन दोन राज्यांतील शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना देऊन केंद्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील तीव्र भावना कळविण्याचे विनंती करण्यात आल्याची माहिती माजी खासदार शेट्टी यांनी दिली.

शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे, राष्ट्र सेवा दलाचे अतुल देशमुख, गोवर्धन दबडे, सचिन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोट - शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून हे निवेदन केंद्र सरकारला तातडीने पाठवून देऊ, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी आमदार कपिल पाटील, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे उपस्थित होते.