शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसात लाख शेतकऱ्यांचे राज्यपालांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन ...

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रविवारी मुंबई येथे देण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांतील लाखो शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. देशातील सर्वच राज्यांतून या आंदोलनास शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन दोन राज्यांतील शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना देऊन केंद्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील तीव्र भावना कळविण्याचे विनंती करण्यात आल्याची माहिती माजी खासदार शेट्टी यांनी दिली.

शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे, राष्ट्र सेवा दलाचे अतुल देशमुख, गोवर्धन दबडे, सचिन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोट - शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून हे निवेदन केंद्र सरकारला तातडीने पाठवून देऊ, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी आमदार कपिल पाटील, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे उपस्थित होते.