शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कळंब्यात सतेज पाटील गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:52 IST

कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार

ठळक मुद्देसरपंचपदी कॉँग्रेसचे सागर भोगम गटाच्या पंधरा सदस्यांचा विजय; दोन अपक्ष

कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार बाजीराव पोवार यांचा ९७४ मतांनी पराभव केला. १७ प्रभाग सदस्यांपैकी पूर्वी १ सदस्य सतेज पाटील गटाचा बिनविरोध निवडून आला; तर उर्वरित १४ सदस्य सतेज पाटील गटाचे तर २ अपक्ष निवडून आल्याने आता कॉँग्रेसचे १५ व २ अपक्ष असे बलाबल झाले.

आरक्षणाच्या फेरसोडतीने पुढे गेलेल्या कळंबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीने ८१.५२ टक्के मतदान झाले. शनिवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी पार पडली. सरपंचपदासाठी दहा उमेदवार रिंगणात होते. यात कॉँग्रेसचे सागर भोगम २४२२, भाजप महाडिक गटाचे बाजीराव पोवार १४४८ अपक्ष दीपक तिवले ११५२ मते मिळाली. सागर भोगम ९७४ मतांनी विजयी झाले. उर्वरित सात अपक्षांत ६५० मते मिळाली.तर १७ प्रभाग सदस्यांच्या लढतीसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी प्रभाग चारमधून पूर्वीच आशा टिपुगडे बिनविरोध निवडून आल्या. तर उर्वरित १६ सदस्यांपैकी १४ सतेज पाटील गटाचे तर दोन अपक्ष निवडून आल्याने सतेज पाटील गटाने ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.

प्रभाग १ मधून कॉँग्रेसचे राजेंद्र नारायण गुरव, विजय विश्वास खानविलकर, राजश्री प्रकाश पाटील, विजयी प्रभाग २ मधून कॉँग्रेसचे रोहित दिलीप मिरजे, शितल कृष्णात जंगम, विजयी प्रभाग ३ मधून कॉँग्रेसचे अरुण गजानन पाटील, सुहास प्रभाकर जंगम, संगीता शिवाजी तिवले विजयी. प्रभाग ४ मधून कॉँग्रेसचे मीना मारुती तिवले, संग्राम महादेव चौगुले, आशा मनोज टिपुगडे विजयी. प्रभाग ५ - शालिनी रामचंद्र पाटील (अपक्ष), तर कॉँग्रेसचे कांबळे सत्यभामा अमित, शिंदे सोमनाथ लक्ष्मण विजयी. प्रभाग ६ - कॉँग्रेसचे वैशाली संजय मर्दाने,उदय जाधव, तर अपक्ष अलका माने असे विजयी झाले .निवडीनंतर विजयी उमेदवारांनी गावातून रॅली काढली.दीर-भावजय विजयीप्रभाग सदस्यपदी एकाच घरातील दीर-भावजय निवडून आले. प्रभाग एकमधून राजश्री प्रकाश पाटील, तर प्रभाग तीनमधून अरुण गजानन पाटील विजयी झाले.१५ नवीन चेहरेगतवेळच्या १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहाजण निवडणूक रिंगणात होते. चारजण पराभूत झाले; तर दोन सदस्य उदय जाधव व अलका माने प्रभाग सहामधून निवडून आले. १५ नवीन चेहरे ग्रामपंचायतीच्या राजकारणात आले. सर्वांत कमी वयाचे २२ वर्षांचे रोहित दिलीप मिरजे निवडून आले.कळंबा ग्रामपंचायतीत बहुमत मिळाल्यानंतर सागर भोगम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण