शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कळंब्यात सतेज पाटील गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:52 IST

कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार

ठळक मुद्देसरपंचपदी कॉँग्रेसचे सागर भोगम गटाच्या पंधरा सदस्यांचा विजय; दोन अपक्ष

कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार बाजीराव पोवार यांचा ९७४ मतांनी पराभव केला. १७ प्रभाग सदस्यांपैकी पूर्वी १ सदस्य सतेज पाटील गटाचा बिनविरोध निवडून आला; तर उर्वरित १४ सदस्य सतेज पाटील गटाचे तर २ अपक्ष निवडून आल्याने आता कॉँग्रेसचे १५ व २ अपक्ष असे बलाबल झाले.

आरक्षणाच्या फेरसोडतीने पुढे गेलेल्या कळंबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीने ८१.५२ टक्के मतदान झाले. शनिवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी पार पडली. सरपंचपदासाठी दहा उमेदवार रिंगणात होते. यात कॉँग्रेसचे सागर भोगम २४२२, भाजप महाडिक गटाचे बाजीराव पोवार १४४८ अपक्ष दीपक तिवले ११५२ मते मिळाली. सागर भोगम ९७४ मतांनी विजयी झाले. उर्वरित सात अपक्षांत ६५० मते मिळाली.तर १७ प्रभाग सदस्यांच्या लढतीसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी प्रभाग चारमधून पूर्वीच आशा टिपुगडे बिनविरोध निवडून आल्या. तर उर्वरित १६ सदस्यांपैकी १४ सतेज पाटील गटाचे तर दोन अपक्ष निवडून आल्याने सतेज पाटील गटाने ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.

प्रभाग १ मधून कॉँग्रेसचे राजेंद्र नारायण गुरव, विजय विश्वास खानविलकर, राजश्री प्रकाश पाटील, विजयी प्रभाग २ मधून कॉँग्रेसचे रोहित दिलीप मिरजे, शितल कृष्णात जंगम, विजयी प्रभाग ३ मधून कॉँग्रेसचे अरुण गजानन पाटील, सुहास प्रभाकर जंगम, संगीता शिवाजी तिवले विजयी. प्रभाग ४ मधून कॉँग्रेसचे मीना मारुती तिवले, संग्राम महादेव चौगुले, आशा मनोज टिपुगडे विजयी. प्रभाग ५ - शालिनी रामचंद्र पाटील (अपक्ष), तर कॉँग्रेसचे कांबळे सत्यभामा अमित, शिंदे सोमनाथ लक्ष्मण विजयी. प्रभाग ६ - कॉँग्रेसचे वैशाली संजय मर्दाने,उदय जाधव, तर अपक्ष अलका माने असे विजयी झाले .निवडीनंतर विजयी उमेदवारांनी गावातून रॅली काढली.दीर-भावजय विजयीप्रभाग सदस्यपदी एकाच घरातील दीर-भावजय निवडून आले. प्रभाग एकमधून राजश्री प्रकाश पाटील, तर प्रभाग तीनमधून अरुण गजानन पाटील विजयी झाले.१५ नवीन चेहरेगतवेळच्या १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहाजण निवडणूक रिंगणात होते. चारजण पराभूत झाले; तर दोन सदस्य उदय जाधव व अलका माने प्रभाग सहामधून निवडून आले. १५ नवीन चेहरे ग्रामपंचायतीच्या राजकारणात आले. सर्वांत कमी वयाचे २२ वर्षांचे रोहित दिलीप मिरजे निवडून आले.कळंबा ग्रामपंचायतीत बहुमत मिळाल्यानंतर सागर भोगम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण