शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

कोल्हापुरात स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे बचतगट महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 18:33 IST

बचतगट स्थापन करण्यामागे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनविणे हा मुख्य हेतू आहे. कोल्हापुरातील बचतगटांचे काम पाहिले, तर उद्देश सफल झाला आहे. कोल्हापूरचे काम राज्याला आदर्शवत व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार स्टेट बँक आॅफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीणकुमार गुप्ता यांनी काढले. बचतगटांनी आता नुसते उत्पादनच करून थांबू नये, त्याचे मार्केटिंग व्हावे, यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापुरात स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे बचतगट महामेळावाबचतगट उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सहकार्य :प्रवीणकुमार गुप्ता

कोल्हापूर : बचतगट स्थापन करण्यामागे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनविणे हा मुख्य हेतू आहे. कोल्हापुरातील बचतगटांचे काम पाहिले, तर उद्देश सफल झाला आहे. कोल्हापूरचे काम राज्याला आदर्शवत व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार स्टेट बँक आॅफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीणकुमार गुप्ता यांनी काढले. बचतगटांनी आता नुसते उत्पादनच करून थांबू नये, त्याचे मार्केटिंग व्हावे, यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.स्टेट बँक इंडिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात बचतगट महामेळाव्याचे आयोजन केले होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १0 उत्कृष्ट बचतगटांना गौरविण्यात आले.

 महामेळाव्यात बचतगटांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरविल्यानंतर पुरस्कार्थीसमवेत मॅनेजिंग डायेक्टर प्रवीणकुमार गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जनरल मॅनेजर संजयकुमार, डीआरडीए प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव, उपमहाप्रबंधक आबीबूर रहमान, नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, आदी उपस्थित होते.

कोल्हापूरची श्रीमंती आणि कष्टाळूपणा पाहून भारावून गेल्याचे सांगताना प्रवीणकुमार गुप्ता यांनी ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात महिलांची बचतगटातून झालेली प्रगतीही वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले. आर्थिक सक्षमतेसाठी महिलांनी या चळवळीत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही गुप्ता यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, बचतगटांमुळेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राज्यात गौरव झाला आहे, आता देशात होण्यासाठी महिलांनी अधिक सक्रियपणे काम करावे. बॅ्रडिंगला महत्त्व असल्याने बचतगटांनी याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही मित्तल यांनी केले. यावेळी सुनीता पाटील (कुटवाड), उज्ज्वला जाधव (आरग) यांनी मनोगत व्यक्त करताना बचतगटाच्या माध्यमातून झालेली प्रगती कथन केली.जनरल मॅनेजर संजयकुमार, क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव, उपमहाप्रबंधक आबीबूर रहमान, नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, डीआरडी प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची उपस्थिती होती.

गौरविण्यात आलेले बचतगटधनलक्ष्मी बचतगट (कुटवाड), रेणुका बचतगट (हिटणी), आरग बचतगट (आरग), प्रगती बचतगट (कसबा सांगाव), स्वागत बचतगट (कसबा सांगाव), आदर्श बचतगट (कसबा सांगाव), साक्षी बचतगट (कसबा सांगाव), स्वामिनी बचतगट (उजळाईवाडी), सिद्धिविनायक बचतगट (जठारवाडी).

 

 

 

टॅग्स :SBIएसबीआयWomenमहिलाkolhapurकोल्हापूर