शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू करा : शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कोराेना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातील १२ नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी ...

कोल्हापूर : कोराेना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातील १२ नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी पत्राद्वारे केली. यात इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव, गडहिंग्लज, आजरा, हुपरी, शिरोळ, कुरुंदवाड, मलकापूर, कागल या नगरपालिकांसह बांबवडे, गांधीनगर या मोठ्या बाजारपेठा असलेल्या शहरांचा समावेश आहे.

इचलरकरंजी व गांधीनगरमध्ये तर बाजारपेठ खुली व्हावी म्हणून व्यापाऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याची दखल घेत शेट्टी यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी महानगरपालिकातील व्यवहार सुरू करताना नगरपालिका कार्यक्षेत्रांना वगळणे हा दुजाभाव असल्याकडे लक्ष वेधले आहे. शिवाय या नगरपालिकांचा पॉझिटिव्ह दर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याने त्यांनाही निर्बंधांतून मुक्तता मिळणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपासून व्यापारपेठा बंद असल्याने विक्रेते व कामगार, खरेदीदार यांना मोठा फटका बसू लागला आहे. इचलकरंजी शहरात तर १५ हजारांवर छोटे-मोठे उद्योग आहेत. यावर अवलंबून असणाऱ्या लाखो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन विस्कटलेला व्यापार रुळावर आणावा, अशी मागणीही केली आहे.