शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तीनशे वर्षांपूर्वीचा वाडा उतरण्यास प्रारंभ

By admin | Updated: August 7, 2016 00:58 IST

धोकादायक भाग उतरणार : १९ इमारती पाडणार; महापालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई

कोल्हापूर : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दोन घरांच्या भिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मालक आणि कूळ वादातून न्यायप्रक्रियेत अडकलेल्या धोकादायक स्थितीतील १९ इमारती उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी महाद्वार रोड चौकातील गोसावी वाड्याची भव्य तीन मजली इमारत उतरण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे, मालकांचा विरोध न जुमानता पोलिस बंदोबस्तात या इमारतीचा धोकादायक भाग उतरण्यात येत आहे.सुमारे १९ इमारती या कूळ आणि मालक वादामुळे गेली अनेक वर्षे न्यायप्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे त्या इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत, पण या इमारतीला धोका पोहोचल्यास त्यासाठी पुढील जबाबदारी महापालिकेवर येते तसेच त्यामध्ये दुर्घटना घडल्यास नाहक बळी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा इमारतींबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अशा इमारतींचा धोकादायक भाग उतरण्याबाबत सूचना केल्या. त्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोडवरील महाद्वार चौकापासून अंबाबाई मंदिरपर्यंत असणाऱ्या प्रसिद्ध गोसावी वाड्याचे तिसऱ्या मजल्यावरील धोकादायक बांधकाम उतरण्यास प्रारंभ केला. अंबाबाई मंदिरानजीक महाद्वार रोड चौकात गोसावी वाडा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा असून तो अरुण राघवगिरी गोसावी वगैरे ६ जणांच्या नावावर आहे, तर या प्रसिद्ध वाड्यात १३ कुळे पूर्वीपासून आहेत. या इमारतीबाबत मालक आणि कूळ असा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. ही धोकादायक इमारत उतरण्यासाठी महापालिकेचे पथक आल्यानंतर मालकांनी त्यास विरोध करून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीच्या जिन्याला कुलूप लावून अडथळा आणला. अखेर दुपारनंतर पोलिस यंत्रणा आल्यावर मालकांनी कुलूप काढले व बंदोबस्तात इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यास प्रारंभ केला. ही कारवाई करताना काही वेळ महाद्वार रोड, तर पूर्ण दिवस अंबाबाई मंदिराचे महाद्वार प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवले होते.