शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाºयांचा संप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:08 IST

अनुकंपा सेवा भरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस संपावर गेले आहेत.

ठळक मुद्देमागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून बेमुदत संप सभेत निर्णय : विविध संघटनांचा पाठिंबा

कोल्हापूर : अनुकंपा सेवा भरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस संपावर गेले आहेत.

कोल्हापुरात गुरुवारी स्थानिक सुटी असल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही, मात्र शुक्रवारी याची तीव्रता जाणवणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाºयांनी यावेळी व्यक्त केला.

संघटनेतर्फे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १४ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

या संपात पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. सकाळी १० वाजता सर्व कर्मचारी टाऊन हॉल उद्यान येथे जमले. यावेळी झालेल्या सभेत सरकारने मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून ‘बेमुदत संपा’वर जाण्याचा निर्धार कर्मचाºयांनी व्यक्त केला.  शुक्रवारी सकाळी १० वाजता पुन्हा टाऊन हॉल येथे एकत्र येऊन संप यशस्वी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले म्हणाले, कंत्राटी कर्मचाºयांना मंजूर असलेल्या मानधनाऐवजी प्रत्यक्ष हातात पडणाºया मानधनामध्ये खूप तफावत आहे. या मानधनामध्ये कर्मचाºयांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालणे अत्यंत जिकीरीचे होऊन बसले आहे. त्यांना कायम नोकरीमध्ये सामावून घेऊन विविध विभागांत असणाºया चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची रिक्त पदे लवकर भरावीत.

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे म्हणाले, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची संख्येच्या तुलनेत विविध विभागांत असलेली रिक्त पदे यामुळे सध्या असलेल्या कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक हालही होत आहेत.

माजी अध्यक्ष संजय क्षीरसागर म्हणाले, गेली अनेक वर्षे चतुर्थश्रेणी कर्मचारी न्याय व हक्कांच्या मागण्यांकरीता सरकारकडे पाठपुरावा करत आहे; परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. जिल्हा संघटक जयसिंग जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात कृष्णा नाईक, गणेश आसगांवकर, विश्वास पाटील, राजेश वालेकर, राणी घावरी, वैजयंता कांबळे, बाळासाहेब कवाळे, मौला मुल्ला आदी सहभागी झाले होते.

या विभागांचा सहभाग अन् पाठिंबा

या संपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), महसूल, शिक्षण, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तंत्रशिक्षण विभाग, कोषागार कार्यालय, विक्रीकर, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांतील शिपाई, सफाई कामगार, वॉर्डबॉय, चपरासी, चौकीदार, मुकादम, मजूर असे जवळपास एक हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले. त्याचबरोबर या संपाला नर्सिंग फेडरेशन, लिपिक वर्गीय संघटना, वाहतूक संघटना, महाराष्टÑ गव्हर्न्मेंट नर्सेस संघटना, महसूल कर्मचारी संघटना आदींनी या संपाला पाठिंबा दिला.