शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

स्टार ८८४... खिशात मोबाईल स्मार्ट; पण कोणाचाच नंबर नाही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. मोबाईलने माणसाची मेमरी घालविली असून आपला सोडून कुटुंबातील इतरांचा क्रमांकही आपणास लक्षात नसतो. स्वत:चे एकापेक्षा अधिक क्रमांक असले तरी तेही पाठ नसतात. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती तुलनेत अधिक चांगली असल्याचे दिसते.

काळानुरूप मोबाईलचा वापर करणे गरजेचे बनले असले तरी माणूस खूप त्याच्या आहारी गेला आहे. मूळ काम करताना आणि झाल्यानंतरही त्याने स्वत:ला मोबाईलमध्ये गुंतवून घेतल्याने त्याचा परिणाम माणसाच्या स्मरणशक्तीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

असे का होते?

एखाद्या वस्तूचा वापर आपण कसा व किती वेळा करतो, त्यावर त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचेही आहे. ज्यांचे काम आयुष्यभर चाकोरेबद्ध राहिले आहे व नवीन काहीच करण्याचा प्रयत्न नसतो, अशा माणसांना विस्मृतीचा त्रास लवकर सुरू होतो. त्यात वय वाढेल तशी विस्मृतीचे प्रमाण वाढत जाते. आपले काम संपले की लगेच मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो. मोबाईलमध्येही आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे नवीन काही करत नाही. जे आहे ते पाहत बसणे, एवढेच करत असतो.

हे टाळण्यासाठी काय करावे ?

मानवी मेंदू हा इतरांच्या तुलनेत वेगवान असतो. त्याला नेहमी नवनवीन काम दिले की तो त्याची गती कायम राहते. आपले नियमित कामाबरोबरच इतर छंद जोपासणे गरजेचे आहे. मोकळ्या वेळेतील जास्तीत जास्त काळ हा मेंदूला चालना देणारे काम केले तर, विस्मृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नातवापेक्षा अजोबाची स्मरणशक्ती अधिक

घरातील वयोवृद्ध मंडळी ७०-८० वर्षांच्या पूर्वीच्या आठवणी जशा आहेत तशा सांगतात. त्या उलट कुटुंबातील तरुणांची अवस्था आहे. रात्री झोपताना पैशाचे पाकीट कोठे ठेवले, हे दुसऱ्या दिवशी आठवत नाही.

पूर्वीच्या काळी आपल्या नियमित कामाशिवाय खूप वेळ मिळायचा, आता नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली सगळेजण मोबाईलमध्ये अडकून पडल्याने कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. तेच तेच चाकोरेबद्ध कामामुळे मेंदूची क्षमताही काहीसी कमी होते. यासाठी मेंदूला चालना देण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याच्या मागे लागले पाहिजे.

- डॉ. पवन खोत, मानसोपचारतज्ज्ञ

मी मोबाईल फार कमी वापरतो, सतत वेगळ्या कामात गुंतवून घेतल्याने वयाच्या ६६ व्या वर्षीही मला अनेक गोष्टींचे चटकन् स्मरण होते. कुटुंबातील प्रत्येकाने मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आणखी काही वर्षांनी माणूस स्वत:लाच विसरून जाण्याची भीती आहे.

- नामदेव कांबळे, सोनाळी, ता. करवीर