शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

स्टार ८८२.. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पावसाच्या नक्षत्रातच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगातून ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पावसाच्या नक्षत्रातच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून, पिके पिवळी पडून कोमेजू लागली आहेत. आणखी तीन-चार दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असतो. या कालावधीतच भात, ज्वारी, भुईमूग, नागली या पिकांची वाढ जोमात होते. ‘मृग’ नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्यानंतर गेले पंधरा दिवस पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे पिके ढगाकडे बघू लागल्याने आता पिकांना पाण्याची खरी गरज आहे. सोमवारी नक्षत्र बदलल्याने पाऊस सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, उन्हाचा तडाखा वाढतच गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस, पण..

गेल्या वर्षी ४ जुलैअखेर जिल्ह्यात सरासरी ३४० मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी ४०३ मिलिमीटर झाला आहे. म्हणजेच तुलनेत ६३ मिलिमीटर पाऊस जादा होऊनही यंदा पिके धोक्यात आली आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी असला तरी तो सतत राहिला. यंदा मात्र पाच दिवस जोरदार कोसळला आणि त्यानंतर दडी मारली.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी - १८२८ मिलिमीटर

प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४०३ मिलिमीटर

आतापर्यंत झालेली पेरणी - १ लाख २५ हजार ५१८ हेक्टर (७१ टक्के)

तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा

तालुका आतापर्यंतचा पाऊस सरासरी पाऊस

हातकणंगले २३१ ५६७

शिरोळ २२७ ४८८

पन्हाळा ३५३ १७३९

शाहूवाडी ४९७ १९३०

राधानगरी ५१३ २०८७

गगनबावडा ११४० ५२३५

करवीर २९२ १२१५

कागल ३५९ १३४६

गडहिंग्लज ४०९ १०३१

भुदरगड ४१४ १५९२

आजरा ५११ २३७७

चंदगड ५९० २३

कडकडीत ऊन घेऊनच ‘तरणा’ची एंट्री

मान्सूनमध्ये ‘पुनर्वसु’ नक्षत्रात हमखास पाऊस असतो. या काळात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’ पाऊस म्हणतात. सोमवारी सूर्याने ‘पुनर्वसु’ नक्षत्रात प्रवेश केल्याने पाऊस सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, कडकडीत ऊन घेऊनच ‘तरणा’ची एंट्री झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोट-

गेले दहा-बारा दिवस पावसाचा थेंब नसल्याने डोंगरमाथ्यावरील भात, ज्वारी, भुईमूग पिके करपू लागली आहेत. ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने पिके जगवायची तरी कशी, असा प्रश्न आहे.

- बाजीराव भोसले (शेतकरी)

पावसाअभावी माळरानावरील पिके करपू लागली आहेत. भाताची रोप लावण पाण्याअभावी थांबली असून, सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पावसाची गरज आहे.

-सुधीर कानडे (शेतकरी, दुंडगे, गडहिंग्लज)

जिल्ह्यात पावसाने ओढ धरली आहे, त्यात शेती पंप बंद असल्याने पिके अडचणीत आली आहेत. आणखी पाच-सहा दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

- ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)