शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

(स्टार ८५१) मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे होते, कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अपघाताचे व त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे होते, कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अपघाताचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण घसरले. पण कोरोना कालावधीत संसर्गाने मृत्यूची संख्या वाढली. दीड वर्षात प्रथम कोरोना महामारीने व नंतर रस्ते अपघातातील मृत्यू अधिक आहेत. सुमारे पाच हजारांहून अधिक जणांचे मृ्त्यू झाले. त्यामुळे मरण स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी रस्ते अपघातात मोठ्या संख्येने बळी गेले. जिल्ह्यात कोरोनाच्या शिरकावापूर्वी २०१९ मध्ये लहान-मोठे १०२८ अपघात घडले. ३४९ प्राणघातक अपघात ठरले. २०२० मार्चनंतर कोरोनाचा जिल्ह्यात प्रवेश झाला अन्‌ लॉकडाऊन झाले. पुढे उर्वरित कालावधीमध्ये रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली. २०२० मध्ये एकूण १२९२ अपघातांपैकी ३४९ हे जीवघेणे ठरले. दुसऱ्या बाजूने कोरोनाचे साडेचार हजारांवर बळी ठरले. रस्ते अपघातात ५११ जणांचे बळी गेले. कोरोना कालावधीत मृत्यूचे प्रमाण हे मरण स्वस्त झाल्याचे दिसते.

-वर्षे -अपघात - जखमी - मृत्यू

-२०१९ - १०२८ - ८२३ - ३८०

- २०२० - १२९२ - ९७८ - ३३०

- २०२१

(मे पर्यंत) -६१६ - ५०७ - १८१

लॉकडाऊनमध्ये अपघात कमी, पण ....

दीड वर्षात लॉकडाऊनमध्ये रस्ते अपघात घटले, अपघाती मृत्यूही घटले. २०२० मध्ये ३३० जणांचे, तर मे २०२१ पर्यंत १८१ जणांचे प्राणघातक अपघातात मृत्यू झाले. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत १७०५ तर २०२१ च्या दुसऱ्या लाटेत २८७९ असे एकूण साडेचार हजारांवर बळी गेले.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

गेल्या दीड वर्षात पादचारी व्यक्तींनाही धोका वाढला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुण

अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण वर्गाचा मोठा समावेश आहे. साधारण २० ते ३० या वयोगटातील विशेषत; दुचाकीचालक तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

येथे वाहने हळू चालवा...

जिल्ह्यात ८५ ठिकाणी ‘अपघात प्रवणक्षेत्र’ (ब्लॅक स्पॉट) आहेत. तेथे लहान-मोठे अपघात घडतात. त्यापैकी राष्ट्रीय महामार्गावर ९ तर कोल्हापूर शहरात १३ तर उर्वरित ब्लॅक स्पॉट हे तालुकास्तरावर आहेत. येथे नेहमी मोठ्या संख्येने अपघात होतात, येथे वाहने हळू चालवण्याचे फलक झळकतात.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य

कोट..

‘ अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचायचे म्हणून वेगाने दुचाकी चालवली, अतिग्रेनजीक ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या मोटारीने मला उडवले, मला गंभीर दुखापत झाली, सुदैवाने बचावलो. अतिघाई केल्याने दुर्घटना घडल्याचे लक्षात आले.’ - संदीप रंगापुरे, इचलकरंजी.

कोट..

‘मी दुचाकीवरुन संभाजीनगर स्टँडकडून मुख्य रस्त्यावर प्रवेशताना कळंबाकडून जाणाऱ्या जीपची जोराची धडक लागली. माझ्याच घाईगडबडीमुळे दुर्घटना घडली. त्यात मी बेशुद्ध पडलो, त्यानंतर माझा पाय निकामा झाल्याचे रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर लक्षात आले.- अतीश माळी, मंगळवार पेठ, कोल्हापूर