शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

(स्टार ८५१) मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे होते, कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अपघाताचे व त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे होते, कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अपघाताचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण घसरले. पण कोरोना कालावधीत संसर्गाने मृत्यूची संख्या वाढली. दीड वर्षात प्रथम कोरोना महामारीने व नंतर रस्ते अपघातातील मृत्यू अधिक आहेत. सुमारे पाच हजारांहून अधिक जणांचे मृ्त्यू झाले. त्यामुळे मरण स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी रस्ते अपघातात मोठ्या संख्येने बळी गेले. जिल्ह्यात कोरोनाच्या शिरकावापूर्वी २०१९ मध्ये लहान-मोठे १०२८ अपघात घडले. ३४९ प्राणघातक अपघात ठरले. २०२० मार्चनंतर कोरोनाचा जिल्ह्यात प्रवेश झाला अन्‌ लॉकडाऊन झाले. पुढे उर्वरित कालावधीमध्ये रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली. २०२० मध्ये एकूण १२९२ अपघातांपैकी ३४९ हे जीवघेणे ठरले. दुसऱ्या बाजूने कोरोनाचे साडेचार हजारांवर बळी ठरले. रस्ते अपघातात ५११ जणांचे बळी गेले. कोरोना कालावधीत मृत्यूचे प्रमाण हे मरण स्वस्त झाल्याचे दिसते.

-वर्षे -अपघात - जखमी - मृत्यू

-२०१९ - १०२८ - ८२३ - ३८०

- २०२० - १२९२ - ९७८ - ३३०

- २०२१

(मे पर्यंत) -६१६ - ५०७ - १८१

लॉकडाऊनमध्ये अपघात कमी, पण ....

दीड वर्षात लॉकडाऊनमध्ये रस्ते अपघात घटले, अपघाती मृत्यूही घटले. २०२० मध्ये ३३० जणांचे, तर मे २०२१ पर्यंत १८१ जणांचे प्राणघातक अपघातात मृत्यू झाले. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत १७०५ तर २०२१ च्या दुसऱ्या लाटेत २८७९ असे एकूण साडेचार हजारांवर बळी गेले.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

गेल्या दीड वर्षात पादचारी व्यक्तींनाही धोका वाढला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुण

अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण वर्गाचा मोठा समावेश आहे. साधारण २० ते ३० या वयोगटातील विशेषत; दुचाकीचालक तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

येथे वाहने हळू चालवा...

जिल्ह्यात ८५ ठिकाणी ‘अपघात प्रवणक्षेत्र’ (ब्लॅक स्पॉट) आहेत. तेथे लहान-मोठे अपघात घडतात. त्यापैकी राष्ट्रीय महामार्गावर ९ तर कोल्हापूर शहरात १३ तर उर्वरित ब्लॅक स्पॉट हे तालुकास्तरावर आहेत. येथे नेहमी मोठ्या संख्येने अपघात होतात, येथे वाहने हळू चालवण्याचे फलक झळकतात.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य

कोट..

‘ अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचायचे म्हणून वेगाने दुचाकी चालवली, अतिग्रेनजीक ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या मोटारीने मला उडवले, मला गंभीर दुखापत झाली, सुदैवाने बचावलो. अतिघाई केल्याने दुर्घटना घडल्याचे लक्षात आले.’ - संदीप रंगापुरे, इचलकरंजी.

कोट..

‘मी दुचाकीवरुन संभाजीनगर स्टँडकडून मुख्य रस्त्यावर प्रवेशताना कळंबाकडून जाणाऱ्या जीपची जोराची धडक लागली. माझ्याच घाईगडबडीमुळे दुर्घटना घडली. त्यात मी बेशुद्ध पडलो, त्यानंतर माझा पाय निकामा झाल्याचे रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर लक्षात आले.- अतीश माळी, मंगळवार पेठ, कोल्हापूर