शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

(स्टार ८४३) अल्पवयीन मुली घरातच ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना काळातील निर्बंधांचा जीवनावरही परिणाम झाला. निर्बंधांमुळे अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या. त्यामुळे त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना काळातील निर्बंधांचा जीवनावरही परिणाम झाला. निर्बंधांमुळे अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या. त्यामुळे त्या बेपत्ता होण्याचे प्रमाणही घटले. कोरोना कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दीड वर्षात २१५ अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्या. बहुतांशी मुली १६ ते १७ वयोगटातील असून सुंदर, हॅण्डसम मुले पाहून त्याच्यासोबत गेल्याचे नंतर पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर उघड झाले. २०१८ ते मे २०२१ पर्यंत तब्बल ६५९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ६२२ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले.

कोरोनाच्या दीड वर्षात निर्बंधांचा फटका वयात आलेल्या युवक-युवतींनाही बसला. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यातून हरवलेल्या, पळवलेल्या सुमारे दोन हजारांवर महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली. अल्पवयीन मुलगी हरवलेली किंवा पळवून नेलेली असली तरीही पोलिसात त्यांची अपहरणाची नोंद होते. बहुतांशी प्रकरणात महिला व मुली या मर्जीनेच प्रियकारासोबत गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ही वस्तुस्थिती मुलगी सापडल्यानंतर उघड होते. परत आलेल्या मुली अगर महिला प्रियकरासोबत जाणेच पसंद करतात. बेपत्ता अल्पवयीन मुली शोधल्यानंतर त्या पालकांसोबत जाण्यास तयार नसल्यास त्यांना शासकीय निरीक्षणगृहात ठेवले जाते.

जानेवारी ते मे २०२१ कालावधीत सुमारे ८६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. तितक्याच प्रमाणात मुलेही बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अनेकवेळा अल्पवयीन असताना पलायन केलेले पोलिसांनी शोधले नंतर ते सज्ञान झालेले असतात, त्यांना पालकांनी नाकारल्यास त्या स्वतंत्रपणे संसार थाटतात.

अल्पवयीन मुली बेपत्ता :

- २०१८ : २०९

- २०१९ : २३५

- २०२० : १२९

- २०२१ मे पर्यंत : ८६

३७ मुलींचा शोध लागेना

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते. गेल्या साडेतीन वर्षांत ६५९ मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी ३७ मुलींना शोधण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू आहे. अनेकदा पोलीस चौकशीसाठी फिर्यादीच्या घरी फोन करतात, त्यावेळी बेपत्ता मुलगी कधीच घरी आलेली असते, पण फिर्यादी स्वत:हून पोलिसांना कळवतच नाहीत.

शोधकार्यातील अडथळा...

अनेकवेळा फिर्यादीला मुलगी कोठे आहे, कोणासोबत गेली याची कल्पना असते. घरातील सदस्य छुपी मदत करतात तरीही ते पोलिसांपासून माहिती लपवतात. गावपातळीवर राजकीय वादातूनही काहीवेळा तपासच करत नसल्याचा आरोप पोलिसांवर होतो. शोध घेण्यासाठी पथकाला स्वतंत्र वाहन नसल्याची मोठी अडचण आहे.

कोट...

लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज बंद राहिल्याने मुले-मुलींच्या रोजच्या गाठीभेटी बंद झाल्या, त्यामुळे मुली पळून जाण्याचे प्रमाण घटले. मोबाईलचा गैरवापर वाढल्याने अल्पवयीन मुलींवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी मुलींच्या हालचालींवर पालकांची नजर आवश्यक असते.

- श्रद्धा आंबले, सहा. पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर.