शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

(स्टार ८४३) अल्पवयीन मुली घरातच ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना काळातील निर्बंधांचा जीवनावरही परिणाम झाला. निर्बंधांमुळे अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या. त्यामुळे त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना काळातील निर्बंधांचा जीवनावरही परिणाम झाला. निर्बंधांमुळे अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या. त्यामुळे त्या बेपत्ता होण्याचे प्रमाणही घटले. कोरोना कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दीड वर्षात २१५ अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्या. बहुतांशी मुली १६ ते १७ वयोगटातील असून सुंदर, हॅण्डसम मुले पाहून त्याच्यासोबत गेल्याचे नंतर पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर उघड झाले. २०१८ ते मे २०२१ पर्यंत तब्बल ६५९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ६२२ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले.

कोरोनाच्या दीड वर्षात निर्बंधांचा फटका वयात आलेल्या युवक-युवतींनाही बसला. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यातून हरवलेल्या, पळवलेल्या सुमारे दोन हजारांवर महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली. अल्पवयीन मुलगी हरवलेली किंवा पळवून नेलेली असली तरीही पोलिसात त्यांची अपहरणाची नोंद होते. बहुतांशी प्रकरणात महिला व मुली या मर्जीनेच प्रियकारासोबत गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ही वस्तुस्थिती मुलगी सापडल्यानंतर उघड होते. परत आलेल्या मुली अगर महिला प्रियकरासोबत जाणेच पसंद करतात. बेपत्ता अल्पवयीन मुली शोधल्यानंतर त्या पालकांसोबत जाण्यास तयार नसल्यास त्यांना शासकीय निरीक्षणगृहात ठेवले जाते.

जानेवारी ते मे २०२१ कालावधीत सुमारे ८६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. तितक्याच प्रमाणात मुलेही बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अनेकवेळा अल्पवयीन असताना पलायन केलेले पोलिसांनी शोधले नंतर ते सज्ञान झालेले असतात, त्यांना पालकांनी नाकारल्यास त्या स्वतंत्रपणे संसार थाटतात.

अल्पवयीन मुली बेपत्ता :

- २०१८ : २०९

- २०१९ : २३५

- २०२० : १२९

- २०२१ मे पर्यंत : ८६

३७ मुलींचा शोध लागेना

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते. गेल्या साडेतीन वर्षांत ६५९ मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी ३७ मुलींना शोधण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू आहे. अनेकदा पोलीस चौकशीसाठी फिर्यादीच्या घरी फोन करतात, त्यावेळी बेपत्ता मुलगी कधीच घरी आलेली असते, पण फिर्यादी स्वत:हून पोलिसांना कळवतच नाहीत.

शोधकार्यातील अडथळा...

अनेकवेळा फिर्यादीला मुलगी कोठे आहे, कोणासोबत गेली याची कल्पना असते. घरातील सदस्य छुपी मदत करतात तरीही ते पोलिसांपासून माहिती लपवतात. गावपातळीवर राजकीय वादातूनही काहीवेळा तपासच करत नसल्याचा आरोप पोलिसांवर होतो. शोध घेण्यासाठी पथकाला स्वतंत्र वाहन नसल्याची मोठी अडचण आहे.

कोट...

लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज बंद राहिल्याने मुले-मुलींच्या रोजच्या गाठीभेटी बंद झाल्या, त्यामुळे मुली पळून जाण्याचे प्रमाण घटले. मोबाईलचा गैरवापर वाढल्याने अल्पवयीन मुलींवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी मुलींच्या हालचालींवर पालकांची नजर आवश्यक असते.

- श्रद्धा आंबले, सहा. पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर.