शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:52 IST

एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्देएकजुटीमुळे संप यशस्वी-संघटनांचे नेते

कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. संप मिटताच रात्री उपलब्ध होतील त्या कर्मचाऱ्यांमार्फत विविध मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येत होत्या. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शनिवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची गैरसोय टळली.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोणतीही घोषणाबाजी नाही, नुकसान करायचे नाही, असे नियम पाळत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांबाहेर शुकशुकाट होता. दोन दिवसांत कोल्हापूर विभागाचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. ‘शिवशाही’तर्फे दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या, कºहाड, सातारामार्गे जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईतील बैठक यशस्वी झाल्याने संप मागे घेण्यात आला.२ हजार ८६५ कर्मचारी सहभागीकोल्हापूर जिल्ह्णात एस. टी. महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण चार हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. त्यापैकी शनिवारी २ हजार ८६५ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.दोन ‘शिवशाही’ बसची काच फोडलीशिरोली फाटा येथे शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर-पुणे या शिवशाही गाडीची तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसवर नेसरीपासून दोन किलोमीटर अंतरावर अर्जुनवाडी फाट्यावर अज्ञात व्यक्तीने गाडी थांबविण्याचा हाताने इशारा करून वेग कमी झालेल्या बसच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.दिवसभरातील दृष्टिक्षेप

२५ शिवशाही बसगाड्यापुण्याकडे रवाना१ गाडी मुंबईकडे रवानारात्री आठपर्यंत फक्त२ हजार १८० फेऱ्या२८ हजार ८१४ फेऱ्या रद्द७० लाखांचे उत्पन्न बुडाले२ शिवशाही बसगाड्यांवर दगडफेकरात्री दहानंतर संप मागे.संभाजीनगर येथे जेवणाची व्यवस्थासंभाजीनगर आगार येथे परगावच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांबाहेर आगारातील कर्मचाºयांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना सकाळी एकवेळचे जेवण देऊन सर्वजण काम बंद आंदोलनात सहभागी झाले. 

मुंबईतील बैठकीत पगारवाढीबाबात सकारात्मक निर्णय झाल्याने आम्ही काम बंद आंदोलन मागे घेत आहे. सर्व कामगारांच्या एकजुटीमुळेच हे शक्य होऊ शकले.- उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटनाराज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रेट्यामुळे प्रशासनास पगारवाढीबाबात योग्य निर्णय घेणे भाग पडले आहे. मनासारखी जरी पगारवाढ झाली नसली, तरी पगारवाढीच्या जवळपास गेलो आहे.- आप्पासाहेब साळोखे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

टॅग्स :ST Strikeएसटी संपkolhapurकोल्हापूर