शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. सेवेने अखेर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली

By admin | Updated: December 25, 2014 00:17 IST

एस.टी.बस सुरू : कोळिंद्रे-पोश्रातवाडी ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत

नेसरी : राज्यातील अनेक गावांत एस.टी.बस न पोहोचल्यामुळे तेथील नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल आपणास पाहावयास मिळतात. अशीच हालअपेष्टा सोसत असणाऱ्या कोळिंद्रे व पोश्रातवाडी गावच्या अनेक पिढ्यांनी पायपीट करीतच दिवस काढले. मात्र, आज, मंगळवारचा दिवस या दोन गावांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. कित्येक दिवसांच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश आले. आजरा आगाराच्या एस.टी. बसने या दोन्ही गावांत प्रवेश केला अन् ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘लोकमत’ने काल, सोमवारी ‘शिक्षणासाठी १२५ विद्यार्थ्यांची होतेय पायपीट’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून विद्यार्थी व ग्रामस्थांची व्यथा, वेदना व चीड मांडली होती. या बातमीची तत्काळ दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर काल तत्काळ फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आजरा आगाराला कळविले होते. त्यानुसार काल प्रथमच या गावात एस.टी.बस सुरू करून परिवहन खात्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व बुजुर्गांचा आशीर्वाद घेतला.आज गावात एस.टी.बस येणार म्हणून या दोन्ही गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, सरपंच व सदस्य स्वागतासाठी उभे होते. या मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व रस्ते सजविले होते. कोळिंद्रे येथे सकाळी दहा वाजता बस आली. लागलीच तिला ऊस बांधले, पूजा केली व वाहक-चालक यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. तशीच एस.टी. पोश्रातवाडीत आली. गावात एस.टी. येताच फटाकड्या लावून मोठ्या उत्साहाने स्वागत केले. येथेही पुन्हा गाडीची पूजा केली. हार घातले. ग्रामस्थांच्यावतीने पोश्रातवाडीतही वाहक-चालकांचा पुन्हा सत्कार झाला.यावेळी सरपंच सुरेखा पाटील, कस्तुरी बुगडे, रेखा जाधव, शंकर बुगडे, सुरेश बुगडे, सुरेश सावंत, महादेव सुतार, परशराम पाटील, महादेव जाधव, प्राचार्य बी. एम. राजाराम, पोलीसपाटील युवराज देसाई, आनंदा पाटील, धाकोजी खंडागळे, शरद उंडगे, केशव देसाई, आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे अभिनंदन..!विविध सामाजिक प्रश्नांवर नेहमी आवाज उठविणाऱ्या ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून यावर प्रकाशझोत टाकला होता. याची चर्चा आज होती. तत्काळ बस सुरू झाल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात आले.आजच्या पहिल्या एस.टी. बसचे (एमएच १२ ईएफ ६२३८) चालक अरुण गणपती बेलेकर व वाहक संग्राम गणपती सरदेसाई.आज गावात प्रथमच एस.टी. पोहोचून विद्यार्थी व नागरिकांची सोय झाल्याने दोन्ही गावांतील मंडळी, विद्यार्थी, गावपुढारी अगदी खुशीत होते. एस.टी.ची पूजा करून पेढे वाटले.ही बस कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून, परिवहन महामंडळाचे गावकऱ्यांनी आभार मानले.