शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

स्पॉटलाईट--कोल्हापूरचा उमदा लेखक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 23:56 IST

या नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक हे कोल्हापूरचे. त्यांच्याबद्दल थोडेसे.

‘साखर खाल्लेला माणूस’ या व्यावसायिक नाटकाचा आज, गुरुवारी कोल्हापुरात प्रयोग आहे. याचे ७0 दिवसांत ५0 प्रयोग झाले. या नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक हे कोल्हापूरचे. त्यांच्याबद्दल थोडेसे.चित्र, नाट्य आणि कला विषयात सांस्कृतिक कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या आठवड्यात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मृतीनिमित्त अभिनेता प्रशांत दामले यांना कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने दामले यांची भूमिका असलेला साखर खाल्लेला माणूस या नाटकाचा प्रयोगही झाला. हे नाटक लिहिणारे लेखक विद्यासागर अध्यापक असतील. अनुवादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमा कुलकर्णी यांच्यासारख्या लेखिका चित्रांच्या माध्यमातून व्यक्त झाल्या, त्याही कोल्हापुरातच. शिवाय ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांचं नुकतेच निधन झालं. रामनाथांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत २००हून अधिक चित्रपटांचे ध्वनिमुद्रण केले. कॅमेऱ्याप्रमाणेच ध्वनिमुद्रण यंत्रात आणि तंत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. बदलत्या परिस्थितीप्रमाणे रामनाथांनीही नवं तंत्र आत्मसात केले.विद्यासागर अध्यापक या कोल्हापूरच्या लेखकाच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग कोल्हापुरात होत आहे. या नाटकाला व्यावसायिक यश मिळत आहे.२0१४ मध्ये हे नाटक अध्यापक यांनी कोल्हापुरातील कलावंतांना घेऊन केले. त्याला चांगले यश मिळाल्यानंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवीत आहे.लेखक विद्यासागर हे खरंतर २00७ पासून लेखन क्षेत्रात आहेत. तत्पूर्वी प्रायव्हेट हायस्कूलमधून स्नेहसंमेलनातून त्यांनी नाटकात भूमिका केल्या. पुण्यात एस. पी. कॉलेजमध्ये शिकत असताना फिल्म इन्स्टिट्यूटमधील मित्रांमुळे चित्रपट माध्यमांची ओळख झाली आणि तेथूनच वाहिन्यांच्या वेगवेगळ्या मालिकांचे लेखन करू लागले. यानिमित्ताने चं. प्र. देशपांडे, दिलिप जगताप, श्याम मनोहर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. १९९८ मध्ये पुरुषोत्तम करंडकमध्ये त्यांच्याच साक्ष मावळत्या सूर्याची या एकांकिकेला दिग्दर्शनाचे पहिले बक्षीस मिळाले. तेथून प्रायोगिक रंगभूमीशी नाळ जोडली गेली. त्यानंतर त्यांनी मॅन प्लस वूमन इज इक्वल टू ड्रामा, मॅन प्लस वूमन प्लस नेबर्स या दोन एकांकिकेला बक्षिसे मिळाली. मग दर्दे डिस्कोला राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळाले. यातूनच लता नॉर्वेकर यांच्या संस्थेतर्फे ‘आधी बसू, मग बोलू’ हे त्यांचे नाटक प्रथमत: व्यावसायिक रंगभूमीवर आले. चंद्रकात कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात संजय नॉर्वेकर, तेजस्विनी पंडितसारखे कलाकार होते. नंतर भालचंद्र पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रगती एक्सप्रेस नाटकाच्या लेखनासाठी नाट्यदर्पणचा पुरस्कार त्यांना मिळाला. नाटकासोबतच विद्यासागर यांनी नागेश भोसले यांचा पन्हाळा, संजय जाधव यांचा मनातल्या उन्हात या दोन मराठी चित्रपटांचे पटकथा-संवाद लिहिले. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या इंग्लिश-हिंदी भाषेतील आगामी रुटस टू फ्रीडम या चित्रपटाचे लेखन त्यांनी पूर्ण केले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. शिवाय माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या सावित्रीच्या लेकी या सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे दिग्दर्शन सागर यांनी केले.साखर खाल्लेला माणूस नाटकाचे मराठीसोबतच हिंदी, इंग्लिश, गुजराती, कन्नड भाषेत प्रयोग होणार आहेत. शिवाय यावर तेलगू भाषेत चित्रपट बनत आहे. मधुमेह झालेल्या माणसाला हा रोग कसा शिस्त लावतो, हा या नाटकाचा विषय आहे. - संदीप आडनाईककोल्हापूर