शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

By admin | Updated: January 26, 2017 00:58 IST

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपने लावली जोडणी : शिवसेनेलाही घेतले अंगावर, शेट्टी काँग्रेससोबत गेल्यास भाजप अडचणीत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून रोखण्याची मोर्चेबांधणी सुरू केल्याने खडबडून जागा झालेल्या भाजपने बुधवारी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खासदार राजू शेट्टी यांना फोन करून ‘आघाडीचा विषय फार ताणवू नका,’ असे सांगावे अशा हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु स्वाभिमानी संघटना आता एवढी पुढे गेली आहे की त्यांना भाजपबरोबर जाणे शक्य नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, शिवसेनेचीही स्थिती सध्या अशीच असून संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बुधवारी केलेली बोचरी टीका पाहता शिवसेनाही भाजपपासून चार हात लांब गेल्याचे मानण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत जर हे दोन पक्ष विरोधात लढले तर कोल्हापुरातही ही आघाडी होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. शिवसेना-भाजप या युतीची महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवेशानंतर महाआघाडी बनली. संघटनेने भाजपला ‘विश्वासार्ह मित्रपक्ष’ मानून लोकसभा व विधानसभा त्यांच्यासोबत लढविली; परंतु ताकद वाढल्यानंतर भाजपकडून संघटनेला बेदखल करण्यात येऊ लागले. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्याचीच पुनरावृत्ती घडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपल्यासोबत आहेत म्हटल्यावर फारशी कुणाची फिकीर केलेली नाही. संघटनेला त्याचा राग आहे. आम्ही मित्रपक्ष असतानाही आम्हाला साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही आणि परस्पर आघाडीचे जागावाटप जाहीर केले गेल्याने संघटनाही आक्रमक झाली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यात पारंपरिक विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकरही या आघाडीसोबत आहेत. शेट्टी काँग्रेसच्या सोबत गेले तर ते अडचणीचे ठरू शकेल, असे वाटल्याने मग अचानक बुधवारपासून संघटनेशी वाटाघाटी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्याशी संपर्क साधला व चर्चा करूया, म्हणून निमंत्रण दिले; परंतु त्यांनी हा विषय आता माझ्या पातळीवर राहिला नसून तुम्ही खासदार शेट्टी यांच्याशीच बोलावे, असे सुचविले परंतु त्यांच्याशी बोलायचे कुणी, याचे कोडे सुटेना म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनीच शेट्टी यांच्याशी बोलून आघाडीबाबतचा विषय संपवावा, असे ठरल्याचे समजते. (प्रतिनिधी)महाडिक यांचीही नाराजी..स्वाभिमानी संघटनेला फाट्यावर मारण्याची भाजपची भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाही आवडलेली नाही. त्यांनीही याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून संघटनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुचविल्याचे समजते.सांगलीतही आघाडी..खासदार शेट्टी यांनी सांगलीचे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्याशी मंगळवारी आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. तिथेही संघटना व काँग्रेस एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत.