शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

सोनवडेकरांना रोजचाच दुष्काळ

By admin | Updated: March 16, 2015 00:14 IST

पाण्यासाठी दाहीदिशा : शेती कोरडी; संजय राऊत यांनी गाव घेतले दत्तक

प्रवीण देसाई -कोल्हापूर पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण करावी लागत असल्याने जमिनीसाठी कुठले पाणी येणार? त्यामुळे पाण्याविना जमिनी कोरड्या असल्याचे चित्र शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गावचे आहे. नोकरदारांमुळे हे गाव समृद्ध झाल्याचे दिसत आहे. ते अधिक समृद्ध होण्यासाठी येथील शंभर टक्के जमीन ओलिताखाली येण्याची गरज आहे. हे गाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दत्तक घेतले असून, त्यांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.बांबवडेपासून एक किलोमीटर अंतरावरील सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव. वारकरी सांप्रदाय, काँग्रेस विचारांच्या या गावावर माजी खासदार कै. उदयसिंगराव गायकवाड व त्यानंतर माजी आमदार संजय गायकवाड यांचा प्रभाव राहिला आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारणाचे किती गट-तट असले, तरी निवडणुका लागल्या की सर्वजण एकत्र येतात. जमिनी असूनही कोरडवाहू व अल्प उत्पन्नामुळे खासगी, सरकारी नोकरीचा पर्याय बहुतांश जणांनी निवडला आहे. दर दोन घरांमागे सरासरी एक माणूस हा कामानिमित्त मुंबईत आहे. स्पर्धा परीक्षेतही या गावातील तरुण चमकले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन सध्या दहाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्यासाठी या गावचे सुपुत्र व मुंबई विद्यापीठातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकाराने खासदार संजय राऊत यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. केंद्र सरकारचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ या गावाने मिळविला आहे.प्रा. डॉ. दिलीप पाटील यांच्या माध्यमातून गावात मुंबईतील एंपथी फौंडेशनद्वारे इमारत बांधण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावरील जागा मोफत अंगणवाडीला देण्यात आली आहे, तर दुसऱ्या मजल्यावर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले जातात. यासाठी मुंबईहून मार्गदर्शक येत असतात. या गावातच उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना आहे, परंतु या कारखान्यामुळे गावाला कोणताच फायदा झालेला नाही. ज्यांच्या जमिनी कारखान्यासाठी गेल्या, त्यांच्या कुटुंबातील लोकांना येथे नोकऱ्या मिळाल्या, पण तुटपुंज्या अन् अनियमित पगारामुळे ही नोकरी म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था कर्मचाऱ्यांची आहे. सोनवडे गावांतर्गत मानकरवाडी, शिंदेवाडी-जाधववाडी या वाड्या आहेत. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारत जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बांबवडे, मलकापूर, वारणा येथे जावे लागते. पाण्याची कोणतीही योजना नसल्याने गावातील जवळपास ८० टक्के जमीन कोरडवाहू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लघु नळ पाणीपुरवठा योजनेसह हातपंपाची सोय करण्यात आली आहे, परंतु सक्षम अशी योजना नसल्याने अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. कचऱ्याची समस्या असून बांधीव गटारी नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान मिळण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय व तरुणांना बळ मिळण्यासाठी कुस्तीची तालीम आहे. ती थोडी जीर्ण झाली आहे. गावात काँक्रीट, डांबरी व मुरुमीकरण असलेले सहा रस्ते आहेत. विद्यमान पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील यांच्या प्रयत्नांतून ते झाले आहेत. गावाच्या पश्चिमेला तलाव असून त्याचा उपयोग जनावरे धुणे व धुणे धुण्यासाठी होतो.गावातील एकूण भौगोलिक क्षेत्र ३८६.२१ हेक्टर आहे. जमिनीचे जिरायत क्षेत्र ३०८.४४ हेक्टर, तर बागायत क्षेत्र १९ हेक्टर इतके आहे. येथे अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मिरची ही खरीप पिके तर रब्बी ज्वारी,गहू, हरभरा व ऊस ही उन्हाळी पिके अशी येथील पीकपद्धती आहे. गावात कुलदैवत निनाईदेवीसह महादेव मंदिर, मारुती मंदिर, बिरोबा मंदिर अशी प्रार्थनास्थळे आहेत. जयंती, उत्सव कार्यक्रम सामाजिक एकोप्याने मोठ्या उत्साहात साजरे होतात.शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे गाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा सद्य:स्थितीचा ‘लोकमत’ने घेतलेला ‘आॅन दि स्पॉट रिपोर्ट’स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच बंडखोर असलेल्या या गावाने कधीही अन्याय खपवून घेतला नाही. गावातील राजकारण हे निवडणुकीपुरतेच असते. इतरवेळी सर्वजण आपापले गट-तट विसरून गावविकासासाठी एकत्र येतात. आपण गेल्या तीस वर्षांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करत आलो आहे.- विष्णू पाटील, सदस्य, पंचायत समिती, शाहूवाडी