शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गीत, संगीतामुळे पार्किन्सन आजार झाला सुखद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:33 IST

अँकर । श्रीनिवास संगोराम यांच्या जिद्दीची ३२ वर्षांची सुरेल कहाणीकमीच

समीर देशपांडे

कोल्हापूर : वयाच्या पस्तिशीमध्ये त्यांना पार्किन्सनचा आजार झाला. केवळ हाताला किंवा मानेला कंप नाही; तर संपूर्ण शरीरच गदगद हलू लागले. ऐन उमेदीत एखादा खचला असता; परंतु कोल्हापूरच्या श्रीनिवास संगोराम यांनी जिद्द काय असते ते दाखवून दिले आहे. अशाही स्थितीत हा माणूस गाणी म्हणतो, नृत्य करतो, कविता करतो आणि गीतगायनाचे कार्यक्रमही सादर करतो. क्षुल्लक कारणांपायी आयुष्याला नावे ठेवणाऱ्यांना संगोराम यांचेजगणे खरोखरच मार्गदर्शक ठरणारे आहे.

संगोराम मूळचे निपाणीचे. आजरा अर्बन, आवाडे जनता सहकारी बँक आणि यूथ बँकेत त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षांपर्यंत नोकरी केली. वयाच्या ३५व्या वर्षी त्यांना या आजाराने गाठले. परंतु, त्याही काळात त्यांनी आपली नोकरी पूर्ण केली. आज त्यांचे वय ६७ आहे; परंतु या आजारामुळे ते एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नसतानाही त्यांनी केवळ आपल्या छंदाच्या जोरावर आपले आयुष्य अधिक सुरेल बनवले आहे. त्यांनी २३०० कवितांची रचना केली आहे. संगोराम यांनी हातात पेटी घेऊन यातील ५० हून अधिक कवितांना चालीही लावल्या आहेत. आजही भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सुधीर फडके यांच्यासह अनेक गायकांची गाणी त्यांना पाठ आहेत. आजही ते उत्तम पद्धतीने गाण्यांचे आणि कवितांचे सादरीकरण करतात.अनेक स्वयंसेवी संस्था त्यांनामुद्दामहून कार्यक्रमाला निमंत्रित करतात.गाणी सादर करणे, एखादे नृत्य, एखाद्या नाटकातील प्रसंग सादर करीत आजही संगोराम आपल्या या कंप पावणाºया शरीराच्या वेदना विसरतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाºया संगोराम यांना रसिकांची दादहीतशीच मिळते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर असतो; परंतु पत्नीची त्यांना समर्थ साथ लाभली आहे.या सगळ्यांचे कोणत्याना कोणत्या पातळीवर चीज व्हावे, या कविता रसिकांपर्यंत पोहोचाव्यात,हीच आता अपेक्षा आहे.- श्रीनिवास संगोराम, कोल्हापूर

टॅग्स :musicसंगीत