शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

उद्योजकांचे प्रश्न सोडवा,सन्मान द्या

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

राजेश क्षीरसागर : अधिकाऱ्यांना सूचना; जिल्ह्यातील उद्योजक - लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक

शिरोली : उद्योजकांचे स्थानिक व प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत. उद्योजकांशी सन्मानकारक वागा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम आमदार राजेश क्षीरसागर यांनी औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी सभागृहात जिल्ह्यातील उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. क्षीरसागर म्हणाले, उद्योजकांचे परवाने, उद्योग चालू करण्यासाठीचे प्रश्न, औद्योगिक वसाहतीतील समस्या, हे प्रश्न तत्काळ सोडवावेत. सोमवारी (दि. २९) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागतील, असेही क्षीरसागर म्हणाले.या बैठकीत उद्योजकांनी औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात उद्योजक गेले की, तासन् तास उद्योजकांना बाहेर बसविले जाते. उद्योजकांचे परवाने मिळत नाहीत. क्षुल्लक गोष्टींना फेऱ्या माराव्या लागतात, असे प्रश्न उद्योजकांनी मांडले. कोल्हापुरात उद्योग टिकायचा असेल, तर वीजदर कमी करा आणि ऊर्जामंत्र्यांचे सचिव अजय मेहता त्यांना तेथून हकलून लावा. त्यांच्यामुळेच विजेचे दर वाढतात. वीजदर वाढविण्यात मेहतांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे मेहतांना हाकला, अशी मागणी उद्योजकांनी केली. तसेच कंपाऊंड, इंडस्ट्रियल टाऊनशीप, हद्दवाढ, एलबीटी, टोल, वसाहतीमधील चोऱ्या, उद्योगांचे अनुदान, विमानसेवा, रेल्वे, रस्ते, आदी विषयांवर दोन तास चर्चा झाली. यावर क्षीरसागर यांनी उद्योजकांना सहकार्य करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. आमदार सुजित मिणचेकर यांनी औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणे काढण्यासाठी उद्योजक, टपरीधारक आणि अधिकारी यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. तसेच विमानसेवा सुरू नसल्यामुळे कोल्हापूरला मोठे उद्योजक येऊ शकले नाहीत हेही सत्य आहे; पण भविष्यात विमानसेवा नक्की सुरू होणार, असेही मिणचेकर यांनी सांगितले.अमल महाडिक म्हणाले, राज्यातील उद्योजक बाहेर परराज्यात जाऊ नयेत, तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोल्हापूरला बोलावले आहे. तसेच सोशल मीडियामुळे उद्योजक जवळ आले आहेत. अधिकाऱ्यांनी उद्योजकांचे प्रश्न सोडवून सोशल मीडियावर त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. मार्च २०१५ पर्यंत उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न अधिकाऱ्यांनी मार्गी लावावेत. बैठकीस अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर, स्मॅकचे सुरेंद्र जैन, राजू पाटील, देवेंद्र ओबेरॉय, रामराजे बदले, गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, उदय दुधाणे, चंद्रकांत जाधव, श्यामसुंदर जोतला, मोहन कुशिरे, संजय पाटील, अधिकारी अशोक पाटील, आदी उपस्थित होते.