शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘सोहाळे’ बंधारा डागडुजी प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

परस्पर विरोधी भूमिका : सोहाळे येथील राजीव गांधी सिंचन, कृषी विकास योजना बंद होणार ?

ज्योतिप्रसाद सावंत- आजरा -ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ‘सोहाळे’ बंधाऱ्याची डागडुजी व पाणी अडविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ११ लाख ५० हजार रुपयांचा लोकसहभाग १५ जानेवारी पूर्वी न भरल्यास राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद करण्याचा इशारा अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी दिला आहे. तर प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी अडवा त्यानंतर लोकसहभागाचे पाहू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने ‘सोहाळे’चे भवितव्य अधांतरी बनले आहे.‘सोहाळे’ बंधारा हा लघुसिंचन विभागाकडे येतो. सोहाळे बंधाऱ्यावर सुमारे अडीचशे हेक्टर बागायत क्षेत्राचे सिंचन अवलंबून आहे. बंधाऱ्याचे बरगे सडल्याने व बंधाऱ्याची डागडुजी असल्याने यावर्षी पाणी अद्याप अडविण्यात आलेले नाही. पुढील महिन्यापासून येथील पिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. या बंधाऱ्याची डागडुजी करणे व बरगे बदलणे यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी लघुसिंचन विभागाकडे आला आहे.बंधाऱ्याच्या देखरेखीचे काम स्थानिक पाणी वापर संस्थेकडे आहे. ११ लाख ५० हजार रूपयांचा लोकसहभाग झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यारंभ आदेश देता येत नाही, असे लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर लघुसिंचनचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी लोकसहभाग माफही होणार नाही व कमीही होणार नाही, असे सांगत लोकसहभाग भरण्यासंदर्भात १५ जानेवारी ही डेडलाईन दिली आहे.यावेळी बंधाऱ्याचे पाणीच नाही, बंधाऱ्याची दुरुस्तीही सुरू नाही. येथून पुढे दुरुस्ती होणार कधी आणि पाणी अडवणार कधी ? बंधाऱ्यातील पाणी यावर्षी शेतीला उपलब्ध होण्याची शक्यताच नसल्याने प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करा. त्यामध्ये पाणी अडवा त्यानंतरच लोकसहभाग भरू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.दोन्ही बाजूंचा विचार केल्यास सोहाळे या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची ‘डागडुजी’ होणे कठीण बनत चालले आहे. यामुळे या बंधाऱ्याकरिता असणारी राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद होण्याची शक्यता आहे.उशीरा सुचलेले शहाणपणबंधाऱ्यात पाणी अडविण्याचा कालावधी संपत आल्यानंतर लघुसिंचन विभागाला जाग आली आहे. यापूर्वीच ठोस उपाययोजना अथवा बैठक झाली असती, तर कदाचित आज बंधाऱ्यात पाणीही साठले असते.