शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

‘सोहाळे’ बंधारा डागडुजी प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

परस्पर विरोधी भूमिका : सोहाळे येथील राजीव गांधी सिंचन, कृषी विकास योजना बंद होणार ?

ज्योतिप्रसाद सावंत- आजरा -ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ‘सोहाळे’ बंधाऱ्याची डागडुजी व पाणी अडविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ११ लाख ५० हजार रुपयांचा लोकसहभाग १५ जानेवारी पूर्वी न भरल्यास राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद करण्याचा इशारा अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी दिला आहे. तर प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी अडवा त्यानंतर लोकसहभागाचे पाहू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने ‘सोहाळे’चे भवितव्य अधांतरी बनले आहे.‘सोहाळे’ बंधारा हा लघुसिंचन विभागाकडे येतो. सोहाळे बंधाऱ्यावर सुमारे अडीचशे हेक्टर बागायत क्षेत्राचे सिंचन अवलंबून आहे. बंधाऱ्याचे बरगे सडल्याने व बंधाऱ्याची डागडुजी असल्याने यावर्षी पाणी अद्याप अडविण्यात आलेले नाही. पुढील महिन्यापासून येथील पिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाणार आहे. या बंधाऱ्याची डागडुजी करणे व बरगे बदलणे यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी लघुसिंचन विभागाकडे आला आहे.बंधाऱ्याच्या देखरेखीचे काम स्थानिक पाणी वापर संस्थेकडे आहे. ११ लाख ५० हजार रूपयांचा लोकसहभाग झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कामाचा कार्यारंभ आदेश देता येत नाही, असे लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर लघुसिंचनचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. रजपूत यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी लोकसहभाग माफही होणार नाही व कमीही होणार नाही, असे सांगत लोकसहभाग भरण्यासंदर्भात १५ जानेवारी ही डेडलाईन दिली आहे.यावेळी बंधाऱ्याचे पाणीच नाही, बंधाऱ्याची दुरुस्तीही सुरू नाही. येथून पुढे दुरुस्ती होणार कधी आणि पाणी अडवणार कधी ? बंधाऱ्यातील पाणी यावर्षी शेतीला उपलब्ध होण्याची शक्यताच नसल्याने प्रथम बंधाऱ्याची दुरुस्ती करा. त्यामध्ये पाणी अडवा त्यानंतरच लोकसहभाग भरू, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.दोन्ही बाजूंचा विचार केल्यास सोहाळे या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची ‘डागडुजी’ होणे कठीण बनत चालले आहे. यामुळे या बंधाऱ्याकरिता असणारी राजीव गांधी सिंचन व कृषी विकास योजना बंद होण्याची शक्यता आहे.उशीरा सुचलेले शहाणपणबंधाऱ्यात पाणी अडविण्याचा कालावधी संपत आल्यानंतर लघुसिंचन विभागाला जाग आली आहे. यापूर्वीच ठोस उपाययोजना अथवा बैठक झाली असती, तर कदाचित आज बंधाऱ्यात पाणीही साठले असते.