शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा पाटील यांचे निधन

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

महिला चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर : महिला चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा संतराम पाटील तथा कृष्णाबाई दातार यांचे ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज, रविवारी सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले.सुमित्रा पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजेंद्रनगरमधील स्वातंत्र्यसैनिक वसाहतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी तसेच सायंकाळी लक्ष्मीपुरीतील श्रमिक हॉलमध्ये राजकीय, सामाजिक आणि चळवळीच्या क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. पंचगंगा स्मशानभूमीत रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अजित, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात आहे.देवरूख (जि. रत्नागिरी) जवळच्या एका खेडेगावातील दातार कुटुंबात सुमित्रा यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण गरीबीत गेले. शालेय शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सैन्यात नोकरी पत्करली. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर कोल्हापुरात त्या लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्या पक्षात सहभागी झाल्या. संतराम पाटील यांच्याशी लग्न होऊन कृष्णाच्या सुमित्रा बनून त्या पुण्यातून कोल्हापुरात आल्या. नवजीवन संघटनेच्या या दोन पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा झालेला विवाह हा त्यावेळची एक मोठी सामाजिक घटना होती. संतराम यांच्या राजकीय कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी जन्मभर त्यांची साथ केली. त्याकाळी नोकरी करून संसार चालविला तसेच अनेक कार्यकर्त्यांची कुटुंबे तेव्हा एकत्र ‘कम्युन’ (सामुदायिक जीवन) मध्ये राहात. त्यांनी या ‘कम्युन’च्या कर्त्या म्हणून काम केले. संतराम यांच्या निधनानंतरही त्यांच्या समाजकार्याची झेप मंदावली नाही. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. ट्रस्टचे विविध उपक्रम, १५०० हून अधिक स्वयंसहाय्यता बचत गटाची चळवळ यशस्वीपणे चालविली. महिला आरक्षण, आर्थिक साक्षरता प्रबोधनाबाबत त्यांनी परिषदा घेतल्या. वक्तशीरपणा, साधी राहणी, परखड संभाषणकौशल्य ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मराठी, इंग्रजी व संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यासह कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची अनेक वर्षे जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांना राज्य शासनाने ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविले होते. मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे समाजकार्य सुरू होते. ट्रस्टतर्फे चालविलेल्या बचतगटांच्या उपक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील ‘नाबार्ड’ची पहिली मान्यता मिळाली होती. दरम्यान, सुमित्रा यांच्या अंत्यदर्शनासाठी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, यशवंत चव्हाण, सुरेश सावंत, भारती शर्मा, सुरेश शिपूरकर, तनुजा शिपूरकर, आनंदराव पाटील आदींसह मुंबई, पुणे, सांगली, आदींसह परिसरातील कार्यकर्ते आले होते. (प्रतिनिधी)